शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

रस्ते दुरूस्तीवर शासकीय निधीची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 01:25 IST

राज्य शासनाने ग्रामीण रस्ते राज्यमार्गाशी जोडून वाहतूक संपर्क सुलभ करण्यासाठी डांबरीकरण रस्ते बांधकामाला सुरूवात केली.

सहा महिन्यांतच रस्त्यांची वाताहत : सिमेंट काँक्रिट रस्त्यांची मागणी आमगाव : राज्य शासनाने ग्रामीण रस्ते राज्यमार्गाशी जोडून वाहतूक संपर्क सुलभ करण्यासाठी डांबरीकरण रस्ते बांधकामाला सुरूवात केली. परंतु डांबरीकरण रस्ते बांधकामात दुरूस्तीचे कार्य गुणवत्ताहीन असल्यामुळे रस्त्यांची वाताहत झाली आहे. नागरिकांनी डांबरीकरण रस्त्यांना थांबवून सिमेंट काँक्रीट रस्त्यांची मागणी केली आहे. राज्यातील ग्रामीण रस्ते राज्य महामार्गाला जोडून, ग्रामीण भागातील वाहतूक सुलभ व्हावी व ग्रामीण उद्योग व्यवसायांना व रोजगार उपलब्धतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने रस्ते बांधणी योजना कार्यान्वित केली. रस्ते बांधकाम व दुरूस्ती गतीशील व्हावी यासाठी शासनाने रस्ते बांधकामासाठी स्वतंत्र विभागांची निर्मिती केली. योजनेला निधी मंजूर करून रस्ते बांधकाम दुरूस्तीला गती देण्यात आली. परंतु शासनाकडून रस्ते बांधकाम दुरूस्तीला मिळणारा निधी खर्च करूनही निर्माण होणारे रस्ते अधोगतीला पोहोचले. ग्रामीण भागातील दळणवळण शहरांच्या दिशेने गतीशील व्हावी यासाठी शासनाने डांबरीकरण रस्ते व दुरूस्तीला योग्य दिशा दिली. परंतु निर्माण होणारे डांबरीकरण रस्ते अवघ्या सहा महिन्यांतच उखडले. त्यामुळे रस्त्यांवर पडणारे खड्डे, बाहेर पडणारे भगदाड वाहतुकीला आव्हाण देणारे ठरत आहेत. शासनाकडून दरवेळी रस्ते विकास बांधकामावर कोट्यवधी रूपयांचा निधी उधळला जात आहे. रस्ते बांधकाम झाल्यानंतर अवघ्या अल्प कालावधीत रस्त्यांवर पडणारे खड्डे अपघातांना आमंत्रण देतात. ग्रामीण भागातून गेलेल्या राज्यमार्गावर डांबरीकर रस्त्यांच्या वाताहतीमुळे दरवर्षी मार्ग बाधीत होतात. तर वाहनांच्या अपघातामुळे अनेक नागरिकांचा बळी जात आहे. मात्र अपघातांची दखल केवळ रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरूस्तीपर्यंतच असते. त्यामुळे डांबरीकरण रस्ते बांधकाम दुरूस्तीवरील कामांवर कोट्यवधींचा निधी मुरत जातो. शासनाने डांबरीकरण रस्ते बांधकाम दुरूस्तीवरील खर्चाची खातरजमा करून याबाबत निर्णय घ्यावे. तसेच डांबरीकर रस्त्यांची बांधणी बंद करून नागरिकांना दळणवळणासाठी सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या बांधणीला हिरवा कंदील द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.