शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडविण्यात सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 20:23 IST

देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्याअडचणी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : चुल्हाडात काँग्रेस कार्यकर्ता व शेतकरी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्व सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्याअडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची बेहाल करणाºया एनडीए व युतीचे शासनाला मावा, तुडतुडा लावण्यासाठी कंबर कसून सज्ज राहण्याचे आवाहन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.चुल्हाड येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी माजी खासदार नाना पटोले होते. अतिथी म्हणून माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, प्रदेश सचिव ढेंगे, आशावरी देवतळे, प्रमोद तितीरमारे, के.के. पंचबुध्दे, शिवलाल नागपुरे, डॉ. पंकज कारेमोरे, वाहनीचे सरपंच गळीराम बांडेबुचे, मोहाडीचे तालुकाध्यक्ष प्रभु मोहतुरे,तालुकाध्यक्ष शंकर राऊत, बंडु चौरीवार, सहादेव तुरकर, मधुकर लिचडे मंचावर उपस्थित होते.आ.वड्डेटीवारम्हणाले, राज्यात उंदिर घोटाळा सुसुंदरीने उघडकीस आणला. पंरतु पुढील कारवाईकरिता समोर आली नाही. राज्यात उद्योगपतीचे भले करण्यात शासन व्यस्त आहे. शेतकरी मदतीपासुन वंचित आहे. बेरोजगारी गंभिर समस्या असून वाढत्या बलात्काराचे घटनावर सरकारचे मंत्री बेताल व्यक्तव्य करीत आहे.या सरकारला आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत सर्व सामान्य जनतेचे शासन आणण्यासाठी काँग्रेस पक्ष बळकटीकरिता कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे.या मेळाव्यात भाजपचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश पारधी व पचांयत समितीचे माजी सभापती कलाम शेख यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत विजय वड्डेटीवार आणि नाना पटोले यांनी केले. प्रास्ताविक सादर करतांना रमेश पारधी म्हणाले, राज्य शासन जनतेला उपेक्षीत करीत आहेत. शेतकरी, कष्टकरी बांधवाचे वाढत्या समस्या आहे. थ्रीफेज विज पुरविण्यात या सरकारचे काळात एक सेकंद ही वाढ करण्यात आली नाही.राजीव सागर धरणाचे पाणी चांदपुर जलाशयात सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही. गरीबांना चटके देणाºया सरकारचे निषेध करीत भाजप पक्ष सोडण्याची घोषणा केली. यावेळी कलाम शेख यांनी नेतृत्वाचा खरपुस समाचार घेतला. या मेळाव्याला माजी खासदार नाना पटोले, बंडु सावरबांधे, प्रभु मोहतुरे यांनी संबोधीत केले. काँग्रेस पक्षात भाजप हा रामराम ठोकून ६०० कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.यात चुल्हाडच्या सरपंच शिला चौधरी, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश पारधी, सतिष पटले, विलास खरवडे, बपेराचे माजी पंचायत समिती सदस्य अजय खंगार, भाजप दलीत आघाडीच्या अध्यक्षा साधना वालदे, अनिल खंगार, देवसर्राचे माजी उपसरपंच कटरे, गोंडीटोलाचे सरपंच नंदलाल रहांगडाले, किशोर रहांगडाले, महालगावचे योगेश चौरे, पारपिंडकेपारचे माजी सरपंच ओमकांत बुरडे, मोहाडी खाणचे सरपंच सुनिल माने, अंबादास कानतोडे, कुवर बुध्दे, गोंदेखारीचे अर्जुन राणे, बिनाखीचे सरपंच कविता बघेले, भाजप बुध कमीटीचे अध्यक्ष देवेंद्र मेश्राम तथा देवरी (देव), सुकडी (नकुल), टेमनी, चांदपुर, मांगली गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट काँग्रेसाशी झाला.आयोजित मेळाव्याचे संचालन शंकर राऊत, रामेश्वर मोटघरे यांनी केले. तर आभार रमेश पारधी यांनी केले.