शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

युवकांना रोजगार देण्यात शासनाला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:45 IST

मागील तीन वर्षापासून राज्यातील भाजपा-सेनेचे युती सरकार बेरोजगार युवक-युवतीला रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : मुंडीपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील तीन वर्षापासून राज्यातील भाजपा-सेनेचे युती सरकार बेरोजगार युवक-युवतीला रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे आज सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांच्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा काँग्रेस महासचिव व आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी केले.नजीकच्या मुंडीपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जय बजरंग कबड्डी क्रीडा मंडळ मुंडीपार सालेकसाच्या वतीने मुंडीपार येथे तीन दिवसीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जि.प. प्राथमिक शाळा मुंडीपार येथील पटांगणावर आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं.स. सभापती यादनलाल बनोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य विजयकुमार टेकाम, पं.स. सदस्या अर्चना राऊत, मुंडीपारचे सरपंच किरण वाघमारे, माजी सरपंच घनशाम नागपुरे, बलीराम बसोने, राधेशाम नागपुरे, खेमचंद उपराडे, राजगिरे, दमाहे, ढेकवार व अमरचंद जमदाळ, कोरे, कुंभरे, बल्हारे, येसनसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.तीन दिवसीय प्रौढ कबड्डीच्या प्रथम विजेत्या संघाला दहा हजार एक रुपयांचे बक्षीस मिळणार असून, द्वितीय सहा हजार एक, तृतीय ४००१ आणि चौथे बक्षीस २००१ रुपये ठेवण्यात आले आहे. तृतीय बक्षीस सहेसराम कोरोटे यांच्याकडून ठेवण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या मार्गदर्शनात वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागात राहणाºया युवकांना रोजगार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर युवक आपले घरदार सोडून शहराकडे जातात व मोलमजुरी करुन जीवन जगत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना त्यांच्या क्षमतेप्रमाणे व कौशल्याप्रमाणे रोजगाराची संधी मिळाल्यास त्याच्या कुटुंबांना मोठी आर्थिक मदत होईल. परंतु शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी सरकारने बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची देखील सरकारला आता विसर पडला आहे. त्यामुळे हे सरकार फसवे असल्याची टिका केली.बनोटे यांनी क्रीडा स्पर्धांमधून खेळाडूंचा सर्वांगिन विकास होत असल्याचे सांगितले. तसेच अशा प्रकारच्या स्पर्धांचे नियमित आयोजन होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश वाघमारे, सुकदास लिल्हारे, ईश्वर नागपुरे, भोजराज चौडाये, राजकुमार वाघमारे, गेंदलाल जमदाड, महेश उपराडे, कैलास मेश्राम, खेमराज किरसान, राजकुमार बसोने, कुंवर वाघमारे, मदन वाढई, भागीरथ नागपुरे, रमेश लिल्हारे, अनिल नागपुरे, चंद्रप्रकाश नोटे, सुनील नागपुरे, छोटू लिल्हारे यांनी सहकार्य केले.