शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

युवकांना रोजगार देण्यात शासनाला अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:45 IST

मागील तीन वर्षापासून राज्यातील भाजपा-सेनेचे युती सरकार बेरोजगार युवक-युवतीला रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : मुंडीपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील तीन वर्षापासून राज्यातील भाजपा-सेनेचे युती सरकार बेरोजगार युवक-युवतीला रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे आज सर्वत्र सुशिक्षित बेरोजगारांच्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा काँग्रेस महासचिव व आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी केले.नजीकच्या मुंडीपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जय बजरंग कबड्डी क्रीडा मंडळ मुंडीपार सालेकसाच्या वतीने मुंडीपार येथे तीन दिवसीय खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जि.प. प्राथमिक शाळा मुंडीपार येथील पटांगणावर आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पं.स. सभापती यादनलाल बनोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्य विजयकुमार टेकाम, पं.स. सदस्या अर्चना राऊत, मुंडीपारचे सरपंच किरण वाघमारे, माजी सरपंच घनशाम नागपुरे, बलीराम बसोने, राधेशाम नागपुरे, खेमचंद उपराडे, राजगिरे, दमाहे, ढेकवार व अमरचंद जमदाळ, कोरे, कुंभरे, बल्हारे, येसनसुरे आदी मान्यवर उपस्थित होते.तीन दिवसीय प्रौढ कबड्डीच्या प्रथम विजेत्या संघाला दहा हजार एक रुपयांचे बक्षीस मिळणार असून, द्वितीय सहा हजार एक, तृतीय ४००१ आणि चौथे बक्षीस २००१ रुपये ठेवण्यात आले आहे. तृतीय बक्षीस सहेसराम कोरोटे यांच्याकडून ठेवण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या मार्गदर्शनात वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या समस्येवर चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागात राहणाºया युवकांना रोजगार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणावर युवक आपले घरदार सोडून शहराकडे जातात व मोलमजुरी करुन जीवन जगत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील युवक-युवतींना त्यांच्या क्षमतेप्रमाणे व कौशल्याप्रमाणे रोजगाराची संधी मिळाल्यास त्याच्या कुटुंबांना मोठी आर्थिक मदत होईल. परंतु शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सत्तेवर येण्यापूर्वी सरकारने बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाची देखील सरकारला आता विसर पडला आहे. त्यामुळे हे सरकार फसवे असल्याची टिका केली.बनोटे यांनी क्रीडा स्पर्धांमधून खेळाडूंचा सर्वांगिन विकास होत असल्याचे सांगितले. तसेच अशा प्रकारच्या स्पर्धांचे नियमित आयोजन होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश वाघमारे, सुकदास लिल्हारे, ईश्वर नागपुरे, भोजराज चौडाये, राजकुमार वाघमारे, गेंदलाल जमदाड, महेश उपराडे, कैलास मेश्राम, खेमराज किरसान, राजकुमार बसोने, कुंवर वाघमारे, मदन वाढई, भागीरथ नागपुरे, रमेश लिल्हारे, अनिल नागपुरे, चंद्रप्रकाश नोटे, सुनील नागपुरे, छोटू लिल्हारे यांनी सहकार्य केले.