शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाच जिल्ह्यातील शासकीय धान भरडाईला पुन्हा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:28 IST

गोंदिया : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा आतापर्यंत या पाचही जिल्ह्यांत ...

गोंदिया : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा आतापर्यंत या पाचही जिल्ह्यांत १ कोटी लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे, पण या धानाची उचल करून भरडाई करणे राईस मिलर्सने मागील दीड महिन्यापासून थांबविले आहे. त्यामुळे हा धान तसाच उघड्यावर पडला असून, याची लवकर उचल न झाल्यास लाखो क्विंटल धान खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची जिल्हा मार्केटिंग फेडरेशन राईस मिलर्ससह करार करुन भरडाई करते. त्यानंतर राईस मिलर्स भरडाई केलेला तांदूळ शासनाकडे जमा करतात. मात्र यंदा धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची गुणवत्ता योग्य नसल्याने भरडाईनंतर धानाची उतारी कमी येत असून तुकडा होण्याचे प्रमाण ४५ टक्के आहे. त्यामुळे राईस मिलर्सला प्रति क्विंटल मागे ३०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यातील राईस मिलर्सने धानाची उचल करुन भरडाई करणे थांबविले आहे. राईस मिलर्सला प्रति क्विंटल धानापासून ६७ किलो तांदूळ शासनाकडे जमा करावा लागतो, तर २५ टक्केपर्यंत तुकडा हा स्वीकारला जातो. मात्र सध्या १ क्विंटल तांदूळ भरडाई केल्यानंतर त्यापासून ६३ किलो तांदूळ होत असून, तुकड्याचे प्रमाण ४५ टक्के आहे. शिवाय धानाची गुणवत्ता सुद्धा याेग्य नसल्याने प्रति क्विंटलमागे राईस मिलर्सला ३०० रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे तांदळाच्या गुणवत्तेवर सुद्धा परिणाम होत असून, भरडाई केलेला तांदूळ सुद्धा स्वीकारण्यास एफसीआय नकार देत आहे. त्यामुळेच धानाची भरडाई पूर्णपणे ठप्प आहे.

......

धानाचे अपग्रेड करण्याची मागणी

धानाची गुणवत्ता चांगली नसल्याने तांदळाची उतारी कमी येत आहे. त्यामुळे धानाचे अपग्रेड करून प्रति क्विंटल ३०० रुपये राईस मिलर्सला देण्यात यावे, तांदळातील तुकड्याचे प्रमाण २५ टक्केवरून ४० टक्के करण्यात यावे, अशी मागणी राईस मिलर्स असोसिएशनने शासनाकडे केली आहे. पण दीड महिन्यांपासून यावर तोडगा न निघाल्याने राईस मिलर्सने धानाची उचल करून भरडाई करणे बंद केले असल्याचे राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी सांगितले.

.............

२०१०-१३ मध्ये निर्माण झाली होती हीच समस्या

यंदासारखीच परिस्थिती २०१० ते २०१३ या कालावधीत निर्माण झाली होती. पण तेव्हा सुद्धा शासनाने यावर तीन वर्षे तोडगा न काढल्याने खरेदी केलेला ३० लाख क्विंटल धान सडला होता. यामुळे शासनाचे ३९४ काेटी रुपयांचे नुकसान झाले होते, तर यंदा सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पाच जिल्ह्यात खरेदी केलेला एक कोटी क्विंटल धान उघड्यावर पडला असून, मे महिन्यापूर्वी या धानाची उचल केल्यास हा धान खराब होण्याची शक्यता आहे.

.........

टेस्ट मिलिंगची मागणी

शासकीय धान खरेदी केंद्रावर यंदा खरेदी करण्यात आलेल्या धानाची गुणवत्ता चांगली नसल्याने त्याचा परिणाम भरडाईवर हाेत आहे. त्यामुळे आठही तालुक्यातील केंद्रावरील धानाची टेस्ट मिलिंग करून तांदळाचा पडता काढण्यात यावा, अशी मागणी राईस मिलर्सकडून केली जात आहे.