शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

गोठणगावची योजना आॅक्सिजनवर

By admin | Updated: December 11, 2014 23:10 IST

आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या या प्रकारामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील योजना बंद आॅक्सिजनवर आली आहे. असे झाल्यास परिसरातील १५ गावांत पाण्यासाठी हाहाकार होणार आहे.

गोंदिया : आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या या प्रकारामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथील योजना बंद आॅक्सिजनवर आली आहे. असे झाल्यास परिसरातील १५ गावांत पाण्यासाठी हाहाकार होणार आहे. त्यामुळे ही योजना जिल्हा परिषदेने चालवावी अशी मागणी पाणी पुरवठा मंडळाने केली आहे. या मागणीसाठी मंडळाने ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांच्यासह ग्रामाणी पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. गोठणगावच्या या योजनेतून गोठणगाव येथील २२५, बोंडगाव ६०, सुरबन ३५, करांडली ११०, गंधारी ३०, रामनगर ४०, प्रतापगड ४५, मोरगाव १५०, निलज ४५, मालनकपूर २५, माहुरकूडा १०५, झरपडा ६५, बुधेवाडा २५, ताडगाव ४० व अर्जुनी येथील ४५० अशा प्रकारे या १५ गावांतील एकूण एक हजार ४०० कनेक्शधारकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र आजघडीला ही योजना चालविणाऱ्या पाणी पुरवठा मंडळाची आमदनी अठन्नी व खर्चा रूपय्या अशी स्थिती झाली आहे. त्याचे असे की, प्रत्येक कनेक्शनधारकाकडून दरमहा ८० रूपये प्रमाणे एक लाख १२ हजार रूपयांची आवक आहे. तर योजनेचे महिन्याचे वीज बिल एक लाख ७५ हजार रूपये येत असून कर्मचाऱ्यांचा पगार व देखभाल दुरूस्तीपोटी ६० हजार रूपये असे एकूण दोन लाख ३५ हजार रूपयांचा खर्च होतो. म्हणजेच उत्पन्ना पेक्षा एक लाख २३ हजार रूपये जास्तीचा खर्च मंडळाला वहन करावा लागत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेकडून वीज बिलाची अर्धी रक्कम दिली जाते. मात्र तिही मंडळाने बील भरल्यानंतर दिली जात असल्याने अगोदर मंडळालाच वीज बिलाचा भरणा करावा लागतो. मात्र एवढी मोठी रक्कम मंडळाकडे राहत नसल्याने मंडळाची पंचाईत होते. सध्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे तीन लाख ६० हजार ६६० रूपयांचे बील मंडळाकडे आले आहे. मात्र एवढी रक्कम नसल्याने मंडळ हे बील भरण्यास असमर्थ असून असे झाल्यास येत्या ३० तारखेपर्यंत विद्युत कंपनी वीज पुरवठा खंडीत करेल. असे झाल्यास योजना बंद पडून यावर अवलंबीत असलेल्या १५ गावांतील एक हजार ४०० कनेक्शनधारकांचे परिवार पाण्यापासून वंचित राहणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. अशात ही योजना जिल्हा परिषदेने स्वत:कडे घेऊन चालविण्याची मागणी पाणी पुरवठा मंडळाने केली आहे. यासाठी मंडळाने जिल्हाधिकारी यांच्यासह ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना ८ डिसेंबर रोजी निवेदन दिले आहे. (शहर प्रतिनिधी)