शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पोटासाठी नाकारला पोटाचाच गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2017 01:03 IST

स्वत:च्या जेवणाची सोय नसल्याने आपल्या मुलीचे संगोपण कसे करणार या विवंचनेत असलेल्या कुमारी मातेने

कुमारी मातेचा निर्णय : तंटामुक्त समितीकडे गेले होते प्रकरण नरेश रहिले। लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : स्वत:च्या जेवणाची सोय नसल्याने आपल्या मुलीचे संगोपण कसे करणार या विवंचनेत असलेल्या कुमारी मातेने जन्माला घातलेल्या नवजात मुलीला ठेवण्यास चक्क नकार दिला आहे. अनैतिक संबधातून जन्माला घातलेल्या त्या निष्पाष चिमुकलीला आता नागपूरच्या शिशूगृहात ठेवण्याची पाळी आली आहे. तिरोडा तालुक्याच्या खमारी येथील एका २० वर्षाच्या तरूणीशी गावातील प्रेमसंबध जुळले. ते प्रेमाच्या हाणाभाका देत असताना ती मुलीगी कुमारी माता होणार याची चाहूल लागली. हे कळताच त्या मुलीने आपल्या प्रियकराकडे लग्नाचा अट्टाहास धरला. परंतु ती गर्भवती असल्याचे लक्षात येताच त्याने तिला लग्नास नकार दिला. त्यानंतर त्या मुलीने आपले लग्न त्या मुलाशी करून द्यावे, अशी मागणी तंटामुक्त गाव समितीला केली होती. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने या प्रकरणाला हाताळण्यासाठी एक दिवस ठरवून दोघांना बोलावले. परंतु त्या दिवशी आपल्यावर दबाव टाकून लग्न लावतील असा धसका घेत तो तरूण पसार झाला. हे प्रककरण हाताळण्याची संधी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेला मिळालीच नाही. यासंदर्भात तिरोडा पोलिसात तक्रारही करण्यात आली. यानंतर त्या मुलीने त्या नवजात बाळाला ११ मे रोजी जन्म दिला. अनैतिक संबधातून ते मूल जन्माला आल्याने आपल्या भविष्याची राख रांगोळी होऊ नये म्हणून त्या कुमारी मातेनेही त्या चिमुकलीचे संगोपण करण्यास नकार दिला. तिरोडाचे पोलीस निरीक्षक यांनी सदर कुमारी माता व तीचे नवजात शिशु यांना बाल कल्याण समिती, गोंदिया यांच्या समोर हजर केले. यावेळी झालेल्या बयानावरून सदर कुमारी मातेला महिला निवासगृह आणि नवजात शिशूला नागपूरच्या शिशूगृहात तात्पुरते दाखल केले आहे. त्या चिमुकलीचे पौर्णिमा असे नाव ठेवण्यात आले. त्या कुमारी मातेच्या घरी बाल कल्याण समितीने भेट देऊन चौकशी केली असता कुमारी मातेच्या पालकांनी त्या कुमारी मातेला व तिच्या चिमुकलीला स्वीकारण्यास नकार दिला. त्या चिमुकलीचे संगोपण कसे करणार म्हणून त्या कुमारी मातेनेही आपल्या मुलीला स्विकारण्यास नकार दिला.बाल कल्याण समितीने सदर कुमारी मातेला तीचे नवजात शिशुला परत घेण्यासाठी ६० दिवसाचा कालावधी दिला आहे. समितीच्या अध्यक्ष डॉ. माधुरी नासरे यांनी व इतर सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. ६० दिवस आक्षेपासाठी बाल कल्याण समिती, गोंदिया यांनी दिलेल्या आदेशावर सदर कुमारी मातेच्या नातेवाईकांना याबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनाही ६० दिवसाच्या आत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, कार्यालय जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अंगुर बगीचा रोड गजानन कॉलनी गोंदिया येथे मो. ७७०९६६१०४६, ९४०५९८५३४९ यावर संपर्क साधावा. किंवा प्रत्यक्ष भेट घेण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुहास एस. बोंदरे यांनी केले आहे.