शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

घरगुती वातावरणात ‘शुभमंगल....सावधान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST

बिरसी-फाटा : कोरोनाचे संकट लग्नातील चुकीच्या परंपरा रोखण्यासाठी यशस्वी ठरले आहे. कोरोनामुळे यावर्षीच्या लग्नसराईत घरगुती व साध्या पद्धतीने विवाह ...

बिरसी-फाटा : कोरोनाचे संकट लग्नातील चुकीच्या परंपरा रोखण्यासाठी यशस्वी ठरले आहे. कोरोनामुळे यावर्षीच्या लग्नसराईत घरगुती व साध्या पद्धतीने विवाह आटोपले जात आहे. परिणामी लग्नातील अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात टळत आहे.

लग्न एकदाच असे बोलून लग्नसोहळ्यांत लाखो रुपयांचा चुराडा होतो. ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी सामूहिक विवाह सोहळे सुरू झाले. कीर्तनकार व प्रवचनकार अनेक वेळा खर्च टाळण्याचे आवाहन करतात. मात्र यात त्यांना अद्याप तरी फारसे यश आले नाही. जिल्ह्यात दरवर्षी हजारांवर लग्नसोहळे होतात व त्यात २ लाखांपासून ते कोट्यवधी रुपयांचा खर्चा केला जातो. काही श्रीमंत नागरिक तर श्रीमंतीचे दर्शन घडवतात. त्यांचे बघून गोरगरीब व मध्यमवर्गीयही कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे विवाह थाटामाटात करू लागले. ही अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी अनेक मंडळींनी आजपर्यंत प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. गोरगरीब कुटुंबीयांचा लग्नाचा खर्च वाचावा यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेऊन सामूहिक विवाह सोहळे घेतात. यावर्षी कोरोनामुळे सामूहिक विवाह सोहळे रद्द झाले. मात्र, कोरोनामुळे गर्दीवर नियंत्रण आल्याने पर्यायाने खर्चावरही निर्बंध आले आहे.

लग्नसमारंभाचे सोहळे शाही थाटात करण्याची जणू परंपराच सुरू झाली आहे. लग्नपत्रिकेतील नावे, हळदी समारंभाला लाखो रुपये खर्च, वरातीत धुमधडाका, पक्वान्नांची जेवणावळ, मिरवणुकीला हत्ती, घोडे त्यात डीजेचा आवाज अशा लग्नसोहळ्यांवर आता आपसूकच निर्बंध आल्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च कमी झाला आहे.