शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

गोंदिया ते नागपूर रेल्वे प्रवास झाला ८ तासांचा; प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 15:43 IST

तीन-चार दिवसांपासून समस्या

गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे ढासळले आहे. गोंदिया ते नागपूर या दोन तासांच्या प्रवासासाठी एक्स्प्रेस असो की मेल सात ते आठ तास लागत आहे. आउटवर व ठिकठिकाणी एक ते दीड तास गाड्या थांबविल्या जात आहे. यामुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले असून, रेल्वे विभागावर असंतोष व्यक्त करीत आहे.

हावडा-मुंबई मार्गावरील कळमना, सालवा दरम्यान मागील तीन-चार दिवसांपासून इंटरलॉकिंगचे काम सुरू आहे. यामुळे विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस व छत्तीसग, शिवनाथ या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे, तर काही एक्स्प्रेस आणि मेल गाड्या सुरू आहेत. 

मंगळवारी (दि.८) गोंदिया रेल्वे स्थाकावरुन सिकंदराबाद एक्स्प्रेस ही रात्री ८.३० वाजता सुटली तर ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 3.४० ला नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचली. तर बुधवारी ओखा एक्स्प्रेस ही सायंकाळी ४ वाजता सुटली ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर रात्री ११ वाजता पोहोचली. गोंदिया ते नागपूर या प्रवासाठी तव्चल ७ ते ८ तास लागले. यामुळे अनेक प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी अडचण झाली आहे. काही प्रवाशांना रात्र उपाशीपोटी काढावी लागली. तर रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी दोन ते दीड तास थांबविली जात असल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. 

मागील तीन-चार दिवसांपासून हाच प्रकार कायम असल्याने आणि यात रेल्वे प्रशासनाने कसलीही सुधारणा न केल्याने रेल्वे प्रवाशांचा मनस्ताप कायम आहे.

मालगाड्यांसाठी प्रवासी गाड्या वेटिंगवर

कोरोना कालावधी केवळ मालगाड्याच सुरु होत्या. यातून रेल्वेला चांगला महसूल मिळाला. तेव्हापासून रेल्वे बोर्डाने प्रवासी गाड्यांऐवजी मालगाड्यांना प्राधान्य दिले आहे. तोच प्राधान्यक्रम अद्यापही कायम असल्याने प्रवासी गाड्या थांबवून मालगाड्या सोडल्या जात आहे. परिणामी, या प्रवासी गाड्या चार ते पाच तास विलंबाने धावत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

आउटरवर गाड्यांची रांग

प्रवासी गाड्यांना आउटरवर एक ते दीड तास थांबवून मालगाड्या आधी सोडल्या जात आहे. यामुळे प्रवासी गाड्या रेल्वे स्थानकाजवळ नियोजित वेळेत पोहोचून देखील त्यांना आउटवर थांबविले जात असल्याने त्या उशिराने धावत आहे. तर आउटवर एका मागे एक गाड्यांची रांग लागत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीIndian Railwayभारतीय रेल्वे