शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

गोंदियात वृक्षारोपणचा फज्जा

By admin | Updated: August 7, 2015 01:34 IST

गोंदिया नगर पालिकेच्या वतीने तीन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शहरात ८०० रोपट्यांची लागवड करण्यात आली.

फक्त २०० रोपटे जिवंत : लागवड केलेले ६०० रोपटे झाले गायबकपिल केकत  गोंदियागोंदिया नगर पालिकेच्या वतीने तीन वर्षांसाठी राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शहरात ८०० रोपट्यांची लागवड करण्यात आली. मात्र त्यातील फक्त २०० रोपटे जीवंत असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. यातून नगर पालिका प्रशासनाची वृक्षारोपण कार्यक्रमातील उदासीनता स्पष्ट झाली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी गोंदियासह नागपूरच्या काही संस्थांकडून निविदा टाकण्यात आल्याची माहिती आहे. मात्र वृक्षारोपणाचा हा कंत्राट प्रवर्तक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला देण्यात आला. या संस्थेचे सचिव प्रतीक अनिल भालेराव तर अध्यक्ष शारदा नारनवरे यांनी कंत्राट मिळवितानाही मोठी कसरत केल्याची चर्चा आहे. पण वृक्षारोपणाचे काम मात्र अपेक्षेप्रमाणे झाले नाही.वाढते प्रदूषण ही शासनापुढे सर्वात गंभीर समस्या बनून उभी आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यावर खर्चासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. प्रदूषणाच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वृक्षारोपणाला प्राधान्य दिले जात आहे. शासकीय यंत्रणेपासून तर सामाजिक संस्थांनाही वृक्षारोपणाच्या या कामात समाविष्ट करण्याची शासनाची धडपड आहे. त्याअंतर्गत गोंदिया नगर पालिकेनेही शहरात वृक्षारोपणाचा आणि त्या रोपट्यांच्या संगोपनाचा कंत्राट प्रवर्तक बहुउद्देशिय सामाजिक संस्थेला दिला होता.वृक्षारोपणाच्या या कामासाठी नगर परिषदांना कार्यक्रम आखून देण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील मोकळ््या जागेवर वृक्षारोपण करून शहर हिरवेगार करावयाचे आहे. मात्र गोंदिया नगर परिषदेने इथेही आपली उदासीनता दाखविली. न.प.कडून राबविण्यात येत असलेल्या तीन वर्षांच्या कार्यक्रमात कंत्राट देण्यात आलेल्या संस्थेने शहरातील भीमघाट परिसर, भीमनगर शाळा मैदान, आंबेडकर वॉर्ड, बौद्ध विहार, रिंग रोड, मोक्षधाम रोड, गणेशनगर शाळा, गोविंदपूर शाळा परिसरात आतापर्यंत फक्त ८०० रोपटी लावल्याचे सांगितले जात आहे. त्यातील ६०० रोपटी मरण पावली असून फक्त २०० रोपटी जीवंत असल्याची माहिती कार्यक्रम राबविणाऱ्या यंत्रणेकडून मिळाली आहे. २८.५० लाखांचा वृक्षारोपण कार्यक्रम या कार्यक्रमांतर्गत पालिकेकडून संस्थेला ५७० रूपये प्रतीरोपटे दिले जाणार आहे. ८०० रोपटे तीन वर्षे जगल्यास त्या वर्षे संस्थेला २८ लाख ५० हजार रूपये मिळू शकतात. मात्र संस्थेकडून केले जाणारे काम संशयास्पद ठरत आहे. फक्त २०० रोपटेच जीवंत असल्याने रोपट्यांचे संवर्धन कशा पद्धतीने होत आहे हे स्पष्ट होत आहे.वृक्षारोपणाचा उद्देश वाऱ्यावरपालिकेकडून तीन वर्षांसाठी वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जात आहे. पाच हजार झाडे लावण्याचे उद्दीष्ट असलेल्या या कार्यक्रमासाठी २० जून २०१३ रोजी निविदा काढण्यात आली. त्याला ७ सप्टेंबर रोजी आमसभेची मंजूरी मिळाली. प्रवर्तक बहुउद्देशिय संस्थेला २० जानेवारी २०१४ रोजी वर्क आॅर्डर देण्यात आली.वृक्षारोपण कार्यक्रमावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता कोरडे यांच्याकडे आहे. पण वृक्षारोपणाचा कार्यक्रम कधीपासून कधीपर्यंत राबविला जाणार आहे हे सांगणे त्यांना कठिण झाले आहे. शिवाय संस्थेने लावलेले ६०० रोपटे मरण पावले तर फक्त २०० रोपटे जीवंत असल्याची माहितीही या विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे वृक्षारोपणाचा खरा उद्देश किती साध्य झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे.बगिचा प्रभाऱ्यांनी केली रोपट्यांची मागणीविविध सामाजिक तसेच निसर्गप्रेमी संस्था व व्यक्तींच्या माध्यमातून शहरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात. अशात त्यांना सहज रोपटी उपलब्ध व्हावी या दृष्टीने येथील सुभाष बागेचे प्रभारी प्रवीण मिश्रा यांनी लागवड अधिकाऱ्यांकडे पाच हजार रोपट्यांची मागणी केली आहे. वनीकरण विभागाकडून रोपटी उपलब्ध झाल्यास संस्था किंवा ज्यांना रोपट्यांची गरज आहे त्यांना येथून रोपटी पुरविता येतील, असा त्यांचा यामागचा हेतू आहे.