शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

तिरोडा मुख्याधिकाऱ्यांकडे गोंदिया न.प.चा प्रभार

By admin | Updated: June 21, 2015 01:04 IST

गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे दीर्घ रजेवर गेले असल्याने त्यांचा प्रभार तिरोडाचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना देण्यात आला आहे.

शुक्रवारीपासून काम सुरू : ठरावीक दिवस नाहीगोंदिया : गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे दीर्घ रजेवर गेले असल्याने त्यांचा प्रभार तिरोडाचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांना देण्यात आला आहे. प्रभार देण्यात आला असला तरिही येथील कामकाजावर मात्र प्रभाव पडणार असल्याचे दिसून येत आहे. कारण प्रभारी मुख्याधिकारी आपल्या सवडीनुसार गोंदिया कार्यालयात येणार असल्याचे कळले. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत नागरिकांची कामे रेंगाळणार यात शंका नाही. मुख्याधिकारी मोरे व नगरसेवक शिव शर्मा यांच्यातील वादाने काही दिवस नगर परिषद कार्यालयाचा कारभार बंदच होता. त्यानंतर लगेच नगर परिषद कर्मचारी संघटनेचे नेते छेदीलाल इमलाह यांच्या हत्येनंतर सफाई कामगारांनी नगर परिषदेत तोडफोड केली. त्यामुळे नगर परिषद बंद ठेवण्यात आली होती. हे सर्व प्रकार सुरूच असताना १५ जून पासून मुख्याधिकारी मोरे रजेवर गेले. विशेष म्हणजे त्यांनी रजेचा कालावधी दशर्विलेला नसल्याचे कळले. त्यात पालिकेचा प्रभार गुरूवार (दि.१८) पर्यंत कुणाकडेही देण्यात आलेला नव्हता. शुक्रवारी (दि.१९) प्रभार तिरोडाचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांच्याकडे देण्यात आल्याचे कळले. उरकुडे यांच्याकडे गोंदिया नगर परिषदेचा प्रभार देण्यात आलेला असतानाही येथील कारभार मात्र प्रभावीत झाल्याचेच दिसते. कारण येथील कर्मचारी साहेब नसल्याने आमच्याकडे अधिकार नाही असे कारण पुढे करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यात प्रभारी मुख्याधिकारी उरकुडे सुद्धा कार्यालयात हजर राहणार नाहीत. अशात कर्मचारी त्यांचे कारण पुढे करून हात मोकळे करून घेणार. एकंदर याचा परिणाम कामकाजावर होणार असून नागरिकांची कामे मात्र खोळंबणार यात शँका नाही. तरीही गोंदियावासीयांची कामे खोळंबणारप्रभारी मुख्याधिकारी उरकुडे यांना तिरोडा नगर परिषदेचा कारभार बघून गोंदियाचाही कारभार बघावा लागणार आहे. असे असताना त्यांनी गोंदिया कार्यालयासाठी ठराविक दिवस दिला नाही. शिवाय शुक्रवारी ते गोंदिया कार्यालयात दोन तास बसले होते असे कळले. अशात त्यांच्या अनुपस्थितीत मात्र नागरिकांची कामे खोळंबणार यात शंका नाही. शिवाय मुख्याधिकारी नसल्याने कर्मचारीही मनमर्जीने कारभार करणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही. बहुतांश कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पालिकेतील बहुतांश क र्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. अगोदरच बिएलओचे काम देण्यात आलेले असताना आता इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्याने कर्मचाऱ्यांत नाराजीही दिसून आली. मात्र उपाय नसल्याने कर्मचारी मनमारून कामे करीत आहेत. इलेक्शनच्या या ड्युटीमुळे मात्र कर्मचारी जागेवर उपलब्ध राहत नाहीत. त्याचाही परिणाम कामकाजावर पडत असून नागरिकांची कामे खोळंबतात.