शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

गोंदियातील नाल्या ‘नो अपडेट’

By admin | Updated: June 8, 2014 23:58 IST

प्रशासनाच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियोजनपूर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र या सूचनांचे पालन कितपत केले जाते याचे ताजे उदाहरण म्हणजे गोंदिया नगर परिषद आहे.

गोंदिया : प्रशासनाच्या वतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी नियोजनपूर्व कामे करण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र या सूचनांचे पालन कितपत केले जाते याचे ताजे उदाहरण म्हणजे गोंदिया नगर परिषद आहे. पावसाळ्याला सुरुवात होण्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना शहरातील नाल्या, गटारांची साफसफाई व पावसाळ्यापूर्वी नियोजनात्मक राबविण्यात येणारी कामे अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे शहरवासीयांना समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यापुर्वी शहरातील नाल्या, गटारे ‘नो अपडेट’ आहेत,असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. मात्र या समस्येकडे नगर प्रशासनाने दुर्लक्ष करीत आपल्या कानावर हात ठेवले आहे. गोंदिया शहर आणि घाणीचे साम्राज्य यांचा जवळचा संबंध आहे. केरकचर्‍याची नियमित विल्हेवाट न लावणे, नाल्या, गटारे यांचा नियमित उपसा न होणे या सर्व बाबी आता शहरवासीयांकरिता नित्याच्याच झाल्या आहेत. खरे तर या सर्व गोष्टींची जबाबदारी नगर परिषदेची आहे. मात्र याच विभागाचे सध्या याकडे दुर्लक्ष झाले असल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापुर्वी करण्यात येणार्‍या कामाचा आराखडा तयार करून ती कामे सुरू करण्यात येतात. मात्र गोंदिया नगर परिषदेने आराखडा तर तयार केला, मात्र प्रत्यक्षात कामाला अद्यापही सुरुवात केली नसल्याचे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या घाणीवरून आणि नाल्यांमध्ये साचलेल्या गाळावरून दिसून येते. शहरातील प्रत्येक वॉर्डात हे चित्र असून या घाणीच्या साम्राज्याने शहरवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. शहरातील  वॉर्ड क्र. १ क्षमा बेकरी परिसरातील नाल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. या नाल्या केरकचर्‍याने तुडुंब भरल्या आहेत. रस्त्याच्या कडेलादेखील केरकचर्‍याचे ढिगारे पडले आहेत. बर्‍याच दिवसांपासून या केरकचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली नाही. त्यामुळे वॉर्डात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे तक्रार केली. मात्र त्यांच्या तक्रारीला स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांनी केराची टोपली दाखविली आहे. वॉर्डातील केरकचर्‍याची विल्हेवाट लावण्याकरिता लोखंडी कंटेनर ठेवण्यात आले आहेत. मात्र केरकचर्‍याने कंटेनर भरल्यानंतर त्याची नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने हे कंटेनर केवळ शोभेची वस्तू ठरले आहेत. स्वच्छता विभागाचे अधिकारी तर वॉर्डात कधीच फिरकत नसून कागदावर मात्र सर्व व्यवस्थित असल्याचे दाखविले जात असल्याची माहिती आहे. एकंदरीत स्वच्छता विभागाच्या अधिकार्‍यांच्या दबंगशाहीमुळे शहरवासीयांना मात्र समस्येचा सामना करावा लागत आहे. नाल्यांमध्ये व रस्त्यांवर साचून असलेल्या कचर्‍यामुळे साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील स्वच्छतेचा प्रश्नाला जेवढे नगर प्रशासन जबाबदार आहे, तेवढेच शहरातील नागरिकदेखील जबाबदार आहेत. कचरा कचरापेटीत न टाकता नाल्यांमध्ये व रस्त्यांवर टाकत असल्याने शहराच्या अस्वच्छेत भर पडली आहे. नागरिकांनीही काही गोष्टीचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या मुद्यावर आपल्या कानावरचे हात केव्हा बाजूला करून कामाला सुरुवात करते, हे मात्र येणारा काळच सांगेल. (तालुका प्रतिनिधी)