शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

गोंदिया जिल्ह्यात २२ हजार हेक्टरमधील धानपिकाला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:21 IST

गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला शेतकऱ्यांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामानंतर उन्हाळी धानाची लागवड केली जाते. यंदा २२ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी वातावरणात अचानक बदल झाल्याने त्याचा पिकांवर परिणाम झाला आहे. वादळी पावसामुळे सर्वाधिक फळबागांचे नुकसान झाले. आब्यांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला.गोंदिया जिल्ह्यात खरीपात १ लाख ७८ हजारावर तर रब्बीमध्ये ४६ हजारावर धानाची लागवड केली जाते. खरीप व रब्बी हंगामातील धान निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. यंदा जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली. धान पिकासाठी अनुकुल वातावरण मिळाल्याने धान पीक जोमात आले होते.मात्र सोमवार आणि मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा उन्हाळी धानाला फटका बसला. तर ढगाळ वातावरण असल्याने धान पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सुध्दा पुन्हा दोन तीन दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. खरीप व रब्बीनंतर शेतकरी वर्षभराचा खर्च भरुन काढण्यासाठी उन्हाळी धानाची लागवड करतात. याची शेतकऱ्यांना बरीच मदत होत असते. मात्र अवकाळी पाऊस आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

फळबागांना फटकाअवकाळी पाऊस आणि वादळाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील आंब्याच्या बागांना बसला आहे. वादळामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून बागधारकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.ढगाळ वातावरणामुळे धानावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर अवकाळी पावसामुळे धानासह इतर पिकांना फटका बसू शकतो.- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :agricultureशेती