शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

गोंदिया जिल्ह्यात २२ हजार हेक्टरमधील धानपिकाला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 14:21 IST

गोंदिया जिल्ह्यात धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला शेतकऱ्यांवर संकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामानंतर उन्हाळी धानाची लागवड केली जाते. यंदा २२ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. धान पिकाची स्थिती चांगली असताना मागील दोन दिवसापासून असलेले ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा धानाला फटका असून शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला जाण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने पूर्व विदर्भात पुढील तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सोमवारी आणि मंगळवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी वातावरणात अचानक बदल झाल्याने त्याचा पिकांवर परिणाम झाला आहे. वादळी पावसामुळे सर्वाधिक फळबागांचे नुकसान झाले. आब्यांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला.गोंदिया जिल्ह्यात खरीपात १ लाख ७८ हजारावर तर रब्बीमध्ये ४६ हजारावर धानाची लागवड केली जाते. खरीप व रब्बी हंगामातील धान निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. ते शेतकरी उन्हाळी धानाची लागवड करतात. यंदा जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली. धान पिकासाठी अनुकुल वातावरण मिळाल्याने धान पीक जोमात आले होते.मात्र सोमवार आणि मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाचा उन्हाळी धानाला फटका बसला. तर ढगाळ वातावरण असल्याने धान पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून याचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने सुध्दा पुन्हा दोन तीन दिवस ढगाळ वातावरण राहिल्यास कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. खरीप व रब्बीनंतर शेतकरी वर्षभराचा खर्च भरुन काढण्यासाठी उन्हाळी धानाची लागवड करतात. याची शेतकऱ्यांना बरीच मदत होत असते. मात्र अवकाळी पाऊस आणि कीडरोगांमुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

फळबागांना फटकाअवकाळी पाऊस आणि वादळाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील आंब्याच्या बागांना बसला आहे. वादळामुळे आंब्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून बागधारकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.ढगाळ वातावरणामुळे धानावर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर अवकाळी पावसामुळे धानासह इतर पिकांना फटका बसू शकतो.- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :agricultureशेती