शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

गोंदिया जिल्ह्यातील तीस हजार शेतकऱ्यांचे खाते क्रमांक गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 15:10 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन स्वरूपात जमा केले जाणार आहे.

ठळक मुद्देमानधनाची रक्कम जमा करण्यास अडचण कृषी विभागाची वाढली डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन स्वरूपात जमा केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक,आधारकार्ड, सातबारा आदी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू आहे. मात्र या योजनेस पात्र तब्बल तीस हजार शेतकऱ्यांचे खाते क्रमांक नसल्याने कृषी व महसूल विभागाची डोकेदुखी वाढली आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ८६ हजार खातेदार शेतकरी आहेत. यापैकी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेस दोन हेक्टरपर्यंत शेती असणारे २ लाख ५४ हजार २४२ शेतकरी पात्र ठरले. कृषी आणि महसूल विभागाकडून योजनेस पात्र शेतकºयांची माहिती महाआॅनलाईनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. या योजनेचा पहिला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू आहे.आत्तापर्यंत २ लाखावर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक नसल्याने त्यांच्या खात्यावर पैसे जमा करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार जवळपास ३० हजार शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले नाही. याची सूचना सुध्दा प्रत्येक गावातील ग्रामपंचायतमध्ये याद्या प्रकाशित करुन दिली जात आहे.ज्या पात्र शेतकऱ्यांचे बँक खाते नाही त्यांना खाते उघडून खाते क्रमांक कृषी विभागाकडे देण्यास सांगितले जात आहे.नावातील घोळ कायमअनेक शेतकऱ्यांच्या सातबारावर वेगळे आणि आधारकार्डवर वेगळे नाव असल्याने या शेतकऱ्यांची माहिती आॅनलाईन अपलोड केल्यानंतर ती जुळत नसल्याने अर्ज स्विकारले जात नाही. त्यामुळे नावातील त्रृटी दूर करण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहे. तर नावातील त्रृटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारले जात नाही. त्यामुळे यासर्व त्रृटी दूर करण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना या सर्व प्रक्रियेचे प्रशिक्षण सुध्दा दिले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी