शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांमुळे गोंदिया जिल्हा समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:24 IST

धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख असून ही ओळख शेतकºयांमुळेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वांगिन दृष्टीने समृद्ध झाल्यास जिल्हा समृद्ध होईल. यासाठी सिंचन प्रकल्प तयार करुन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून त्यांचा सर्वांगिन विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे .....

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दिवाळी मीलन कार्यक्रम, सिंचनाची समस्या दूर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख असून ही ओळख शेतकºयांमुळेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वांगिन दृष्टीने समृद्ध झाल्यास जिल्हा समृद्ध होईल. यासाठी सिंचन प्रकल्प तयार करुन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून त्यांचा सर्वांगिन विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले. स्थानिक प्रताप लॉन येथे आयोजित दिवाळी मीलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उभसभापती चमनलाल बिसेन, माजी सभापती स्रेहा गौतम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, गोंदिया-भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे,अजीत गांधी, पृथ्वीपालसिंग गुलाटी, झामसिंग बघेले,अशोक लंजे, नामदेव किरसान, पी.जी.कटरे, डॉ.योगेंद्र भगत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले, अशोक चौधरी, पराग अग्रवाल, व्यकंट पाथरु, चुन्नीभाऊ बेंद्रे, धनलाल ठाकरे, अरुणकुमार दुबे, विठोबा लिल्हारे,आशिषसिंह नागपूरे, जगदीश अग्रवाल, खेमनबाई बिरनवार, सावलराम महारवाडे, आशिष चव्हान, प्रकाश रहमतकर, भागवत नाकाडे, डोमेंद्र रहांगडाले, दिलीप असाटी, शेषराव गिरेपुंजे, खेमराज साखरे उपस्थित होते.आ.अग्रवाल म्हणाले, तालुक्यातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बाघ सिंचन प्रकल्पातंर्गत येणाºया ३०० कि.मी.नहराचे खोलीकरण व दुरूस्ती करण्यात आली. खमारी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून लवकरच १० नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहेत.तालुक्यातील सर्व ६६ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करुन नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.रावणवाडी येथे ५ कोटी रुपयांच्या निधीतून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात येणार आहे.मागील वर्षी कामठा, नवरगाव, बटाना, खातीया येथे तयार करण्यात आलेल्या बंधाºयामुळे एक हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय झाली आहे. पांजरा-लंबाटोला दरम्यान ५ कोटी रुपयांच्या निधीतून बंधारा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर तालुक्यातील ३४ गावांचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आला आहे. तालुक्यात सर्वत्र १५० कि.मी.लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.त्यामुळे नागरिकांची रस्त्यांची समस्या मार्गी लागली आहे. सीमा मडावी म्हणाल्या, जनतेला खोटी आश्वासने देवून केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या सत्तारुढ सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहन केले. अंबुले म्हणाले सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.केवळ मोठमोठ्या घोषणा करुन प्रत्यक्षात एकाही योजनेची अंमलबजावणी केली नाही. उलट जनतेला महागाई आणि दरवाढीची भेट दिली. त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन त्यांनी केले. दिवाळी मिलन कार्यक्रमाला उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल