शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

शेतकऱ्यांमुळे गोंदिया जिल्हा समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:24 IST

धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख असून ही ओळख शेतकºयांमुळेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वांगिन दृष्टीने समृद्ध झाल्यास जिल्हा समृद्ध होईल. यासाठी सिंचन प्रकल्प तयार करुन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून त्यांचा सर्वांगिन विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे .....

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दिवाळी मीलन कार्यक्रम, सिंचनाची समस्या दूर करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान उत्पादकांचा जिल्हा अशी गोंदियाची ओळख असून ही ओळख शेतकºयांमुळेच निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सर्वांगिन दृष्टीने समृद्ध झाल्यास जिल्हा समृद्ध होईल. यासाठी सिंचन प्रकल्प तयार करुन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून त्यांचा सर्वांगिन विकास करण्याचे आपले ध्येय असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले. स्थानिक प्रताप लॉन येथे आयोजित दिवाळी मीलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, जि.प.आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, उभसभापती चमनलाल बिसेन, माजी सभापती स्रेहा गौतम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, गोंदिया-भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे,अजीत गांधी, पृथ्वीपालसिंग गुलाटी, झामसिंग बघेले,अशोक लंजे, नामदेव किरसान, पी.जी.कटरे, डॉ.योगेंद्र भगत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, राजेश नंदागवळी, रत्नदीप दहीवले, अशोक चौधरी, पराग अग्रवाल, व्यकंट पाथरु, चुन्नीभाऊ बेंद्रे, धनलाल ठाकरे, अरुणकुमार दुबे, विठोबा लिल्हारे,आशिषसिंह नागपूरे, जगदीश अग्रवाल, खेमनबाई बिरनवार, सावलराम महारवाडे, आशिष चव्हान, प्रकाश रहमतकर, भागवत नाकाडे, डोमेंद्र रहांगडाले, दिलीप असाटी, शेषराव गिरेपुंजे, खेमराज साखरे उपस्थित होते.आ.अग्रवाल म्हणाले, तालुक्यातील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बाघ सिंचन प्रकल्पातंर्गत येणाºया ३०० कि.मी.नहराचे खोलीकरण व दुरूस्ती करण्यात आली. खमारी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असून लवकरच १० नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहेत.तालुक्यातील सर्व ६६ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये डॉक्टरांची नियुक्ती करुन नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.रावणवाडी येथे ५ कोटी रुपयांच्या निधीतून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात येणार आहे.मागील वर्षी कामठा, नवरगाव, बटाना, खातीया येथे तयार करण्यात आलेल्या बंधाºयामुळे एक हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सोय झाली आहे. पांजरा-लंबाटोला दरम्यान ५ कोटी रुपयांच्या निधीतून बंधारा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर तालुक्यातील ३४ गावांचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आला आहे. तालुक्यात सर्वत्र १५० कि.मी.लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.त्यामुळे नागरिकांची रस्त्यांची समस्या मार्गी लागली आहे. सीमा मडावी म्हणाल्या, जनतेला खोटी आश्वासने देवून केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या सत्तारुढ सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत धडा शिकविण्याचे आवाहन केले. अंबुले म्हणाले सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही.केवळ मोठमोठ्या घोषणा करुन प्रत्यक्षात एकाही योजनेची अंमलबजावणी केली नाही. उलट जनतेला महागाई आणि दरवाढीची भेट दिली. त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन त्यांनी केले. दिवाळी मिलन कार्यक्रमाला उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल