शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत पुन्हा ३६ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 14:26 IST

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देआमगाव, अर्जुनी मोरगाव तालुक्यात वाढले रुग्णदहा दिवसात तीनशे रुग्णांची भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. १० ऑगस्टपर्यंत ३६१ कोरोना बाधितांची नोंद झाली होती. मंगळवारी (दि.११) यात पुन्हा ३६ कोरोना बाधितांची भर पडल्याने हा आकडा ३९७ वर पोहचला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात मंगळवारी आढळलेल्या ३६ कोरोना बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ८, देवरी तालुक्यातील ४, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ८, तिरोडा तालुक्यातील ७, आमगाव तालुक्यातील ८ आणि गोरेगाव तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. गोंदिया, आमगाव आणि तिरोडा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने हे तिन्ही तालुके आता कोरोनाचा हॉटस्पॉट होत असल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.१०) तिरोडा तालुक्यातील पाटीलटोला येथील एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी गेला आहे.कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून दररोज सरासरी ५० नवीन रुग्णांची भर पडत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने संसर्ग वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता गावकऱ्यांनीच कंबर कसल्याचे चित्र आहे.आमगाव व सालेकसा येथे जनता कर्फ्यूआमगाव आणि सालेकसा तालुक्यातील मागील दोन दिवसात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी शहरवासीय आणि व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारपासून (दि.१२) आमगाव येथे सात दिवस तर सालेकसा येथे सहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या कालावधीत या दोन्ही शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद राहणार आहे.उपाययोजना राबविण्यात प्रशासन अपयशीजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. क्वारंटाईन सेंटर आणि कोविड केअर सेंटरमधील अनागोंदी कारभाराच्या दररोज तक्रारी पुढे येत आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये योग्य सोयी सुविधा दिल्या जात नसल्याने अनेकजण बाहेरुन आल्यानंतर प्रशासनाला माहिती न देता थेट घरी जात आहेत. यातूनच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे.नागरिकांनो वेळीच व्हा सावधमागील आठ दहा दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, नियमित मास्कचा वापर, दिवसभरातून वांरवार हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच आपल्यासमोरील व्यक्ती ही कोरोना बाधित आहे असे समजून स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस