शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर असलेला गोंदिया जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यात काही दशकांपूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण यापैकी आता काहीच शिल्लक आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा, लोहारा,नवतलाव या तीन तलावांकरिता सामाजिक वनिकरण, जैवविविधता विभाग व वनविभागाची मदत घेवून या जलाशयाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला.

अंकुश गुंडावार ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जलाशयांच्या संवर्धनासाठी पर्यावरण, जैवविविधतेसह इतर घटक महत्त्वपूर्ण असतात. मात्र प्रदूषणाचे प्रमाण अधिक असेल तर याचा जलाशयांवर आणि पक्ष्यांच्या स्थलांतरणावर सुध्दा मोठा परिणाम होतो. कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन असल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचे अनुकुुल परिणाम सुध्दा दिसून आहे. वन्यप्राण्यांचा सुध्दा मुक्त संचार वाढला आहे. गोंदिया जिल्हा जैवविविधतेने नटलेला असल्याने दुर्मिळ समजले जाणारे सारस पक्षी आणि स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर अशी ओळख गोंदिया जिल्ह्याची होवू लागली आहे. जलाशयांमधील जैवविविधता टिकविण्यासाठी स्वयंसेवी संस्थेने सन २०१२ पासून धडपड सुरू केली. त्यातून परसवाडा, लोहारा व आमगाव येथील नवतलाव अशी तीन उत्कृष्ट जलोद्याने तयार झाली आहेत. तर बाजारटोला, झालीया, झिलमीली या तलावांमधील जैवविविधता जोपासून पक्षी आणि त्यावर अवलंबून असलेल्या घटकांचे संवर्धन केले जात आहे. जिल्ह्यात काही दशकांपूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण यापैकी आता काहीच शिल्लक आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा, लोहारा,नवतलाव या तीन तलावांकरिता सामाजिक वनिकरण, जैवविविधता विभाग व वनविभागाची मदत घेवून या जलाशयाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. जैवविविधता, त्यावर येणारे पक्षी आणि पर्यावरण याचा अभ्यास करुन जलाशय टिकविण्याच्या मूळ कारणांचा शोध घेण्यात आला.जैवविविधतेने नटलेला जिल्हातलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात जैवविविधतेने नटलेला आहे. तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामध्ये अनेक जैव वनस्पती आहेत. या तलावांमध्ये पक्ष्यांसाठी पोषक असलेलेले खाद्य मिळत असल्याने दरवर्षी लाखो विदेशी पक्षी जिल्ह्यातील जलाशयांवर हजेरी लावतात. नवेगावबांध परिसर यासाठी प्रसिध्द आहे.दुर्मिळ समजल्या जाणाºया व प्रेमाचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाºया सारस पक्ष्यांचे सुध्दा या ठिकाणी अधिवास तयार झाले आहे.सर्वाधिक ४४ सारस पक्ष्यांची नोंद ही जिल्ह्यात झाली आहे.जिल्हा जंगल व्याप्त असल्याने या अनेक दुर्मिळ वनस्पती सुध्दा आढळतात. सालेकसा तालुक्यातील मुरकुडोह दंडारी येथील जंगलात दुर्मिळ बांबु असून त्यापासून चांगली बासरी तयार केली जाते.गोंदिया जिल्ह्यात अनेक दुर्मिळ वनस्पती असून जलाशयांचे प्रमाण देखील अधिक आहे.या जलाशयांमध्ये पक्ष्यांसाठी पोषक असलेले खाद्य आणि अनुकुल जैवविविधता असल्याने स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. या जलाशंयामधील वनस्पतींचे संवर्धन करण्याची गरज आहे. चिला, कमळ यासारख्या वनस्पतींचे प्रमाण वाढविल्यास पक्ष्यांना खाद्य मिळण्यास मदत होईल.- मुकुंद धुर्वे , पर्यावरणतज्ज्ञतलावांचे रिस्टोरेशन, व्यवस्थापन व कृती आराखडा आणि अमंलबजावणी करून तीन तलावांचे पुनरूज्जीवन करण्यात आले. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामे केली. गावात भिंतीवर चित्र काढून जनजागृती केली. त्यामुळे जिल्ह्यातील तीन जलाशये पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ‘मॉडेल’ ठरत आहेत.- सावन बहेकार, पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य