शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

गोंदिया जिल्ह्यात बाघ नदीने धोक्याची पातळी ओलांडली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 08:10 IST

Gondia News बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, गोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव नदीवरील छोट्या पुलावरून तीन फूट पाणी बुधवारी (दि. १५) वाहत होते.

ठळक मुद्दे पुजारीटोला, कालीसरार धरणाचे दरवाजे उघडले

 लोकमत न्यूज नेटवर्क

 गोंदिया : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे, तर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणातून पाणी सोडण्यात आले. परिणामी बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, गोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव नदीवरील छोट्या पुलावरून तीन फूट पाणी बुधवारी (दि. १५) वाहत होते. बाघ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. (In Gondia district, the Bagh river crossed the danger level)

 

मध्य प्रदेशातील संजय सरोवर ८५ टक्के भरले आहे. या धरणाची पातळी संतुलित ठेवण्यासाठी पुढील २४ तासांत या धरणाचे दरवाजे केव्हाही उघडण्यात येण्याची शक्यता आहे. या धरणातून पाणी सोडल्यास बाघ नदीच्या पाणीपातळीत अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय रजेगाव नदीवरील छोट्या पुलावरून बुधवारी तीन फूट पाणी वाहत होते. या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने देवरी, सालेकसा, आमगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यांतील नदी काठालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे १ फुटाने, तर कालीसरार धरणाचे तीन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आला आहे. बाघ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सालेकसा आणि आमगाव तालुक्यांतील तीन-चार नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने हे मार्ग बंद होते. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत २६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे धान पिकांना संजीवनी मिळाली असून, बळिराजा सुखावला आहे.

 

सरासरीच्या तुलनेत ८७ टक्के पाऊस

जिल्ह्यात १ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत ११२१ मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत या कालावधीत १०६८.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाची सरासरी ९५.३ टक्के आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १२२० मिमी पाऊस पडतो त्या तुलनेत ८७.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

..............

टॅग्स :riverनदीfloodपूर