शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

गोंदिया आगाराला बसतोय दररोज ८ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करावे लागले असून राज्याची सर्वच अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. दुसऱ्या ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करावे लागले असून राज्याची सर्वच अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात प्राणहानी केल्याने जनता आता चांगलीच धास्तावलेली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच नातेवाईक आजारी असल्यास त्यांची भेट व मृत्यू झाल्यास प्रवासाला मुभा दिली आहे. मात्र नागरिकांनी आता प्रवासाकडे पाठ फिरविल्यामुळे प्रवाशांअभावी लालपरीची चाकेच थांबली असून ती जागीच उभी आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य रस्ते परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसला होता. त्यात आता दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनने पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मात्र राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच आजारी नातेवाईकाची भेट किंवा मृत्यू झाल्यास प्रवासाला मुभा दिली आहे. मात्र दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली आहे. याची दहशत आजही नागरिकांच्या मनात असल्याने महत्त्वाच्या कामानेच घराबाहेर पडत असून प्रवास पूर्णपणे बंद ठेवला आहे.

परिणामी राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या लालपरीची चाके जागीच थांबली असून येथील आगाराला त्याचा चांगलाच फटका बसत आहे. आगारात दररोज बसेस लावल्या जात आहेत. मात्र प्रवासीच नसल्याने बसेस आहेत तशाच उभ्या राहत आहेत. किमान १०-१५ प्रवासी उपलब्ध झाल्यास वेगवेगळ्या मार्गांवर बसेस सोडण्याची आगाराची तयारी आहे. मात्र शोकांतिका अशी की, तेवढे प्रवासीही मिळत नसल्याने आगाराची अडचण होत आहे.

-----------------------------

दररोज ८-१० लाखांचा फटका

या महिन्यातील ५-६ तारखेपासून प्रवाशांनी येथील बसस्थानकाकडे फिरकणेच बंद केल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरिक प्रवास टाळत असल्याने याचे हे परिणाम जाणवत आहेत. बसस्थानकावर बसेस उभ्या केल्या जात असूनही प्रवासी येत नसल्याने आगाराला दररोज सुमारे ८-१० लाख रूपयांचा फटका सहन करावा लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे आगाराची हीच स्थिती झाली होती. आता मध्यंतरी स्थिती रूळावर येत असताना आता पुन्हा तेच दिवस परतून आले आहेत.

---------------------------------

कोट

१०-१५ प्रवासी मिळाल्यास आम्ही वेगवेगळ्या मार्गांवर बसेस सोडण्यास तयार आहोत. मात्र बसेस उभ्या करूनही प्रवासी येत नसल्याने त्या दिवसभर तशाच उभ्या राहत आहेत. परिणामी आगाराला फटका बसत आहे.

- संजना पटले, गोंदिया आगार प्रमुख