शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गोंदिया आगाराला बसतोय दररोज ८ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:29 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करावे लागले असून राज्याची सर्वच अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. दुसऱ्या ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करावे लागले असून राज्याची सर्वच अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात प्राणहानी केल्याने जनता आता चांगलीच धास्तावलेली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच नातेवाईक आजारी असल्यास त्यांची भेट व मृत्यू झाल्यास प्रवासाला मुभा दिली आहे. मात्र नागरिकांनी आता प्रवासाकडे पाठ फिरविल्यामुळे प्रवाशांअभावी लालपरीची चाकेच थांबली असून ती जागीच उभी आहे.

मागील वर्षी कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य रस्ते परिवहन महामंडळाला चांगलाच फटका बसला होता. त्यात आता दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनने पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मात्र राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच आजारी नातेवाईकाची भेट किंवा मृत्यू झाल्यास प्रवासाला मुभा दिली आहे. मात्र दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला असून मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली आहे. याची दहशत आजही नागरिकांच्या मनात असल्याने महत्त्वाच्या कामानेच घराबाहेर पडत असून प्रवास पूर्णपणे बंद ठेवला आहे.

परिणामी राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या लालपरीची चाके जागीच थांबली असून येथील आगाराला त्याचा चांगलाच फटका बसत आहे. आगारात दररोज बसेस लावल्या जात आहेत. मात्र प्रवासीच नसल्याने बसेस आहेत तशाच उभ्या राहत आहेत. किमान १०-१५ प्रवासी उपलब्ध झाल्यास वेगवेगळ्या मार्गांवर बसेस सोडण्याची आगाराची तयारी आहे. मात्र शोकांतिका अशी की, तेवढे प्रवासीही मिळत नसल्याने आगाराची अडचण होत आहे.

-----------------------------

दररोज ८-१० लाखांचा फटका

या महिन्यातील ५-६ तारखेपासून प्रवाशांनी येथील बसस्थानकाकडे फिरकणेच बंद केल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरिक प्रवास टाळत असल्याने याचे हे परिणाम जाणवत आहेत. बसस्थानकावर बसेस उभ्या केल्या जात असूनही प्रवासी येत नसल्याने आगाराला दररोज सुमारे ८-१० लाख रूपयांचा फटका सहन करावा लागत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे आगाराची हीच स्थिती झाली होती. आता मध्यंतरी स्थिती रूळावर येत असताना आता पुन्हा तेच दिवस परतून आले आहेत.

---------------------------------

कोट

१०-१५ प्रवासी मिळाल्यास आम्ही वेगवेगळ्या मार्गांवर बसेस सोडण्यास तयार आहोत. मात्र बसेस उभ्या करूनही प्रवासी येत नसल्याने त्या दिवसभर तशाच उभ्या राहत आहेत. परिणामी आगाराला फटका बसत आहे.

- संजना पटले, गोंदिया आगार प्रमुख