शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गोंदिया व तिरोडा आगाराच्या बसफेऱ्या रद्द

By admin | Updated: July 23, 2014 23:41 IST

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाली आहेत. काही रस्त्यांवरून गेलेल्या नदी-नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने एसटी महामंडळाची बससेवा प्रभावित झाली आहे.

पावसाचा फटका : नागरिकांची डोकेदुखी वाढलीगोंदिया: गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते खराब झाली आहेत. काही रस्त्यांवरून गेलेल्या नदी-नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याने एसटी महामंडळाची बससेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारातून संचालित होणाऱ्या काही बसफेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती गोंदिया व तिरोडा आगार व्यवस्थापकांनी दिली आहे. गोंदिया आगारातून मिळालेल्या माहितीनुसार, वाघनदीच्या पुलावर ८ फूटपर्यंत पाणी चढल्यामुळे गोंदिया-बालाघाट बससेवा बाधित झाली आहे. याशिवाय गोंदिया-देवरी मार्गावर डवकी नाला, गोंदिया-बोडूंदा मार्गावर बोरगाव नाला, गोंदिया-दवनीवाडा-तिरोडा मार्गावर अत्री नाला, गोंदिया-गल्लाटोला मार्गावर खडखडी नाला, गोंदिया-सालेकसा मार्गावर रोंढा नाला, गोंदिया-कामठा-आमगाव मार्गावरील किकरीपार नाल्यावर पाणी चढल्याने या मार्गावरील बस सेवा थांबविण्यात आली आहे. याशिवाय गोंदिया-घिवारी-चांदनीटोला आणि गोंदिया-हिरापूर मार्गावरील पुराडी गावाजवळ वृक्ष पडल्यामुळे मार्ग बंद आहे. २१ जुलै रोजी नाल्यांना पूर आले व रस्त्यांवर वृक्ष पडल्यामुळे जवळपास गोंदिया आगाराच्या ७० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तिरोडा आगारातून रजेगावमार्गे बालाघाटकडे होणाऱ्या एकूण ४० बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या बसेस केवळ सातोनापर्यंतचा प्रवास करून परतत आहेत. तिरोड्यावरून चांदपूरकडे होणाऱ्या १० फेऱ्या (दि.२२) रद्द करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या केवळ बेलाटीपर्यंतच होणार असल्याची माहिती तिरोड्याचे आगार व्यवस्थापक एम.डी. नेवारे यांनी दिली. तसेच तिरोडा-खैरलांजी-वाराशिवनी-बालाघाट असा प्रवास करणाऱ्या बसेस खैरलांजीपुढील रस्ता अत्यंत खराब झाल्याने केवळ खैरलांजीपर्यंतच संचालित करण्यात आल्या आहेत. मलपुरी गावाजवळील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तिरोडा-गोरेगाव बस गावात प्रवेश न करता गावाबाहेरूनच आपला पुढील प्रवास करीत आहे. सरांडी ते केसलेवाडा रस्ता बंद असल्याने मानव विकास कार्यक्रमाच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तिरोडा-गोंडमोहाळी-गोंदिया मार्गावर दवनीवाडा येथील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात किचड तयार होवून रस्ता खराब झाल्याने या मार्गावरील सहा फेऱ्या रद्द रद्द करण्यात आल्या. तिरोडा आगाराने दिलेल्या माहितीनुसार, विविध मार्गांवरील नाल्यांना पूर आल्यामुळे एकूण ४८ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)