शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

२५०० ‘सुकन्यां’ना भविष्याचा वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2015 01:51 IST

मुलींना मुलांपेक्षा कमी लेखू नये, मुलांप्रमाणे मुलींची पालकांनी देखरेख करून त्यांना गगनभरारी घेण्यासाठी प्रवृत्त करावे, ...

योजनेला प्रतिसाद कमीच : आता डाकघरातही खातेदारांसाठी एटीएमनरेश रहिले गोंदियामुलींना मुलांपेक्षा कमी लेखू नये, मुलांप्रमाणे मुलींची पालकांनी देखरेख करून त्यांना गगनभरारी घेण्यासाठी प्रवृत्त करावे, मुलींच्या भृणहत्येवर आळा बसावा यासाठई केंद्र सरकारने पोस्ट आॅफिसमार्फत ‘सुकन्या योजना’ सुरू केली. यामुळे पालकांमध्ये मुलींबद्दल जागरूकता वाढत असली तरी हे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमीच आहे. ३ डिसेंबर २०१४ पासून भारतीय डाक विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेत आतापर्यंत २५०० सुकन्यांचे खाते उघडण्यात आले आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाखांपेक्षा जास्त आहे. ० ते १० वर्षे वयोगटातील मुलींची संख्या किमान दिड ते दोन लाखाच्या घरात निश्चितपणे आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या केवळ २५०० हजार असल्याने हे प्रमाण समाधानकारक नाही. ग्रामीण भागात या योजनेचे लाभार्थी वाढल्यास शेतकरी-शेतमजुर वर्गात मुलगी मोठी होताना वाढणारी चिंता बऱ्याच प्रमाणात दूर होईल. शेतकरी वर्ग नापिकी झाल्यानंतर मुलीचे लग्न कसे करायचे या चिंतेत वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करतात. मात्र सुकन्या योजनेच्या माध्यमातून पैशाची बचत झाल्यास त्यांना अशा पद्धतीने मृत्यूला कवटाळण्याची गरज भासणार नाही. मात्र पोस्ट खात्याकडून त्यासाठी योग्य प्रकारे प्रचार-प्रसार झाला नसल्याचे दिसून येत आहे.गोंदिया मुख्य डाकघरासह ११ उपडाकघरात ‘सुकन्या समृद्धी योजने’शिवाय पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय), पंतप्रधान जीवन ज्योती बीमा योजना (पीएमजेजेबीवाय) व अटल पेंशन योजनेचा (एपीवाय) लाभ घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे.गोंदियातील ग्राहकांसाठी एटीएमनागपूर डाक क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व मुख्य व उपडाकघरांना कोर बँकिंग सोल्युशन (सीबीएस) प्लेटफॉर्मवर आणण्यासाठी एक परियोजना सुरू केली आहे. नागपूर डाक क्षेत्रातील सर्व खातेधारकांना देशातील सर्व डाकघरांच्या नेटवर्कसोबत जोडले जाणार आहे. यासोबतच गोंदिया जिल्ह्याचे डाकघर ग्राहक आपल्या मोबाईलवर देवाण-घेवाणाची माहिती घेऊ शकतात. आतापर्यंत नागपूर जीपीओ, नागपूर सिटी एचओ व यवतमाळ एचओ मध्ये एटीएम होते. आता गोंदिया मुख्य डाकघरातील खातेधारकांसाठी मोफत एटीएम कार्ड उपलब्ध केले जात आहे. देशातील १२४ पोस्टल एटीएम मध्ये कुठेही त्याचा वापर केला जाऊ शकतो.तिसऱ्या मुलीवर मिळतो लाभयोजनेंतर्गत २१ वर्ष पूर्ण झाल्यावर व्याजासह डाक विभागांतर्गत परत करण्यात आली. मुलमी १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शिक्षण व विवाहासाठी ५० टक्के रक्कम आपल्या खात्यातून काढू शकतात. मुलगी १८ वर्ष पूर्ण झाल्यावर शपथपत्र दिले जाते. योजनेंतर्गत जमा होणाऱ्या रकमेवर ९.२ टक्के व्याजासह देण्यात येते. आयकरमध्येही सूट दिली जाते. १० वर्षापर्यंतच्या मुलीच्या आई-वडील, आजा-आजी नातच्या नावाने खाते उघडू शकतात. दोन जुळ्या मुलीनंतर तिसरी मुलगी झाल्यास तिलाही या योजनेचा लाभ घेता येऊ शकते.