शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

जुन्या उड्डाणपुलाचा अहवाल १० जुलैपर्यंत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 22:35 IST

शहरातील गोंदिया-बालघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा. असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर याच विषयावर बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, .......

ठळक मुद्देवाहतूक सुरू ठेवण्यास रेल्वेचा विरोध : बैठकीत विविध विषयांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा. असे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर याच विषयावर बुधवारी (दि.१) जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रेल्वे विभागाने संयुक्तपणे पुलाचे सर्व्हेक्षण करुन १० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपुलाच्या बांधकामाला बरीच वर्षे झाली आहे. त्यामुळे हा पूल जीर्ण झाला असून पुलाला ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक परिसरातील पुलाचा भाग केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी सुरु ठेवणे योग्य नसल्याचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच दिले. त्यानंतर शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली. मात्र आ.गोपालदास अग्रवाल यांनी जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास शहरवासीयांची कोंडी होण्याची शक्यता वर्तविली. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाकडे वरिष्ठ पातळीवर पाठपुरावकरुन जुन्या उड्डाणपुलावरुन दुचाकी आणि चारचाकी हलक्या वाहनाना प्रवेश देण्याची मागणी केली. अग्रवाल यांची मागणी प्रशासनाने तुर्तास मान्य केली. मात्र रेल्वे विभाग जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरु ठेवण्यास अनुकुल नाही. वाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी रेल्वेकडून जिल्हा प्रशासनावर दबाव वाढविला जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी बुधवारी (दि.१) या विषयावर संबंधित विभागाच्या अधिकाºयांची बैठक बोलविली.बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला जुन्या उड्डाणपुलावरुन हलकी वाहनाची वाहतूक सुरू ठेवणे योग्य आहे का असा सवाल केला. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी हलक्या वाहनाची वाहतूक सुरू ठेवण्यास कुठलीही अडचण नसल्याचे सांगितले. मात्र रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली. तसेच एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर जिल्हाधिकारी बलकवडे यांनी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तज्ञ चमूने पुलाचे बारीक सर्वेक्षण करुन आणि सर्व तांत्रिकबाबीची पडताळणी करुन १० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जुन्या उड्डाणपुला संदर्भात निर्णय घेण्यात येईल असे सांगितल्याची माहिती आहे.