शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

उड्डाण पुलास क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे नाव द्या

By admin | Updated: May 15, 2014 01:27 IST

नगरांची रचना होण्यापूर्वी आदिकाळापासून येथे आदिवासींचे निवास आहे. आदिवासींच्या गोंड समाजामुळेच या शहराला 'गोंडिया' म्हणजे गोंदिया असे नाव मिळाले.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : गोंडवाना मित्र मंडळ कल्याण समितीची मागणीगोंदिया : नगरांची रचना होण्यापूर्वी आदिकाळापासून येथे आदिवासींचे निवास आहे. आदिवासींच्या गोंड समाजामुळेच या शहराला 'गोंडिया' म्हणजे गोंदिया असे नाव मिळाले. आदिवासींच्या प्रतिष्ठेसाठी गोंदिया शहरातील नवनिर्मित उड्डाण पुलाला 'क्रांतिवीर बिरसा मुंडा' असे नाव देण्यात यावे, यासाठी गोंडवाना मित्र मंडळ कल्याण समितीतर्फे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना देण्यात आला.निवेदनानुसार, गोंदिया नावाशी आदिवासी गोंड समाजाची आस्था व संस्कृती जुडलेली आहे. देशाच्य मानचित्रात गोंदिया जिल्हा आदिवासी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. हजारो आदिवासी या जिल्ह्यात राहतात. त्यांची ओळख त्यांची संस्कृती र्देकसा (सालेकसा) तालुक्याच्या क्षेत्रातील त्यांचे आराध्य देव 'पहांदी पारी कुपार लिंगो' नावाने ओळखली जाते. तेथे महासंमेलनात देशाच्या प्रत्येक प्रांतातील जनसमुदाय मोठय़ा संख्येत उपस्थित राहतो.त्यामुळे वरिष्ठांनी गोंदियातील नवनिर्मित उड्डाण पुलास 'क्रांतिकारी बिरसा मुंडा' यांचे नाव द्यावे. मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये झाले होते. ते शोषणमुक्त व भयमुक्त भारत निर्माण करू इच्छित होते. समतामूलक समाज स्थापनेचे त्यांचे ध्येय होते. देशाला स्वतंत्र करण्यासाठी इंग्रजांच्या विरूद्ध आपले जल-जंगल-जमीन यासाठी त्यांनी 'उल गुलाल'ची स्थापना केली. त्यामुळे या उड्डाण पुलास त्यांचे नाव दिल्यास ही वास्तू आदिवासी समाजाच्या ओळखीचा आधारस्तंभ ठरेल.शासन केवळ दिखाव्यासाठी आदिवासी समाजासाठी विविध योजना लागू करतो. कारण या योजनांचा लाभ आदिवासींना मिळतच नाही. या समाजाचा नेहमीच शोषण केला जात आहे. आदिवासी समाजाच्या ओळखीसाठी या नवनिर्मित उड्डाण पुलास 'क्रांतिवीर बिरसा मुंडा उड्डाण पूल' असे नाव देण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन गोंडवाना मित्र मंडळ कल्याण समिती तर्फे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी गोंडवाना मित्र मंडळ कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पंधरे, सचिव अनिल वट्टी, प्रमिला सिंद्रामे, पी.बी. टेकाम, उमेश उईके, सुनीता कोकोडे, एस.पी. मरस्कोल्हे, राजेश वट्टी, दुर्गाप्रसाद कोकोडे, नेवालाल उईके, टी.एम. मडावी, तानेश ताराम, ओमप्रकाश पटले, रूपराज कोडापे, परेश्‍वर उईके, एन.डी. किरसान, संजय मरस्कोल्हे, मुन्ना नागभिरे, मंदा तोडसाम, सुषमा मरकाम, जी.जी. तोडसाम, डी.एल. तुमडाम, भरत टेकाम, राधेश्याम टेकाम, विष्णू उईके, दिनेश मडावी, गणेश पंधरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)