शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

मजुरांना रोहयोची कामे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:32 IST

मागील वर्षांत जिल्ह्यात पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : विविध यंत्रणांना समन्वय साधण्याचा दिला सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षांत जिल्ह्यात पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयातून कामे करावे, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि.२३) रोजगार हमी योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते.या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आर. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे उपस्थित होते.बडोले पुढे म्हणाले, रोजगार हमी योजना ही आपल्या राज्याची योजना आहे. मात्र आज आपण या योजनेच्या अंमलबजावणीत माघारलो आहे. तालुका पातळीवर संबंधित यंत्रणांचा या योजनेच्या अंमलबजावणीत महत्वाची भूमिका आहे. तालुका पातळीवर तहसीलदाराने यंत्रणांचे समन्वयक म्हणून भूमिका पार पाडावी. योजनेच्या कामाचा नियमित आढावा दर महिन्याला घ्यावा. ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांना कामे उपलब्ध करु न द्यावे. ग्रामपंचायती व ग्रामस्थांना विश्वासात घेवून रोहयोतून विकास कामे करावी. ज्या मजुरांना मागील कामांची अद्यापर्यंत मंजुरी देण्यात आली नाही, त्यांना ती त्वरित देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा. कुशलच्या कामाची थकीत मंजुरी केंद्र सरकारकडून लवकर उपलब्ध कशी होईल, यासाठी देखील पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले. पांदण रस्ते शेतकºयांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. जिल्ह्यात रोहयोमधून मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते तयार करण्याचे नियोजन करावे. अनेक गावात अंतर्गत रस्त्यांच्या अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी पंचायत समित्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले. सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, सहायक वनसंरक्षक शेंडे, शेख, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व रोहयोचे अधिकारी उपस्थित होते.१३ हजार मजुरांची मजुरी प्रलंबितजिल्हाधिकारी काळे म्हणाले, जिल्ह्यात रोहयोच्या माध्यमातून अकुशलची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. निधी उपलब्ध नसला तरी मजूर मोठ्या संख्येने कामावर येत आहे. जिल्ह्यातील ज्या १३ हजार मजुरांची मजुरी प्रलंबित आहे, निधी उपलब्ध होताच ती त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. ज्या कुटुंबांनी ९० दिवसांपेक्षा जास्त काम केले आहे, अशा कुटुंबातील मजुरांना कामगार कल्याण मंडळाचे फायदे मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत. जिल्ह्यात २२ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर ८६४ कामे व यंत्रणांची ३९१ कामे अशी एकूण १२५५ कामे सुरु आहेत. यावर ६८ हजार ५२९ मजूर कामावर आहेत.