शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गोंदिया जिल्ह्यातील कचारगडला अ दर्जा तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:50 IST

कचारगडला अ दर्जाच्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या स्थळाचा सर्वांगिन विकास करण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ठळक मुद्देराष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन, कोया पुनेम महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कचारगड तीर्थक्षेत्र आदिवासी व समस्त गोंडी समाज बांधवाचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी कोया पुनेम यात्रेदरम्यान आठ लाखाहून अधिक भाविक येथे भेट देतात. या स्थळाशी समस्त गोंडी समाजबांधवाच्या भावना जुळल्या असून या स्थळाचे आणि त्यांचे संस्कृतीचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. कचारगडला अ दर्जाच्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन या स्थळाचा सर्वांगिन विकास करण्यात येईल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे कोया पुनेम महोत्सव व राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम, पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. अशोक नेते, आ.संजय पुराम, विजय रहांगडाले, डॉ.परिणय फुके, देवराव होळी, अशोक उईके, माजी आ.हेमंत पटले, खुशाल बोपचे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल व समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कचारगड या तीर्थक्षेत्राकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळे या परिसराचा विकास खुंटला. मात्र आदिवासी आणि गोंडी संस्कृती फार जूनी असून या संस्कृतीचे जतन करणे आपली जबाबदारी आहे. या संस्कृतीला साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे. या समाजाने जल, जमीन, जंगल वाचविले म्हणून आज आपण श्वास घेवू शकत आहोत. गोंडराजे देखील पुरोगामी आणि पुढारेले होते. त्यामुळे त्यांनी स्थापन व निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे. कचारगड हे आदिवासी आणि गोंडसमाजाचे श्रध्दास्थान व त्यांच्या संस्कृतीची ओळख करुन देणारे स्थान आहे. त्यामुळे या स्थळाचा सर्वांगिन विकास करुन त्याचे निश्चितच जतन केले जाईल. कचारगडला अ दर्जाचे तीर्थ व पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन विकास करण्यात येईल. यासाठी समिती व स्थानिक आमदारांनी विकासात्मक आराखडा तयार करुन तो सादर करावा. याकरिता जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्यात येईल. या परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. आदिवासी समाजबांधवांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. आ. संजय पुराम यांनी कचारगड व परिसरातील समस्या मुख्यमंत्र्यासमोर मांडून त्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊन त्या मार्गी लावण्याची मागणी केली.गोंडी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळवून देणार - नितीन गडकरीकेंद्र व राज्य शासनातर्फे आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. शोषीत, पिडीत आणि मागासलेला समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिन विकास साधने हेच भाजपाचे मुख्य ध्येय आहे. गोंडी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी संविधानाच्या अनुसूचित ८ मध्ये समावेश करण्याची गरज आहे. ही मागणी लवकरच दिल्लीत चर्चा करुन मार्गी लावण्यात येईल. गोंडी भाषेला निश्चितपणे राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

३२ वर्षांनंतर प्रथमच भेट देणारे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्रीसालेकसा तालुक्यातील कचारगड येथे दरवर्षी कोया पुनेम महोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. या यात्रेला देशातील १६ राज्यातील आदिवासी व गोंडी समाजबांधव भेट देतात. मागील ३२ वर्षांच्या इतिहात येथे एकाही मुख्यमंत्री अथवा केंद्रीय मंत्र्याने भेट दिली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे येथे भेट देणारे मागील ३२ वर्षांतील पहिले मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असल्याचे सांगत देवस्थान समितीने त्यांचा गौरव केला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक