शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

एक जॉबकार्डधारकाला २५० दिवस काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:53 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस कामांच्या ऐवजी २५० दिवस कामाची कालमर्यादा वाढविण्यात यावी,

ठळक मुद्देदिलीप बन्सोड : १०० दिवस कामाचा नियम स्थगित करा

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस कामांच्या ऐवजी २५० दिवस कामाची कालमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसीलदार तिरोडा यांना निवेदन देवून केली आहे.निवेदनानुसार, शासनाने एका कुटुंबात एक जॉबकार्ड तयार केल्यास १०० दिवस काम उपलब्ध करून देण्यात येईल, अशी तरतूद केली. एका जॉबकार्डमध्ये पाच नावे असतील तर २० दिवसच काम एका कुटुंबाला मिळणार आहे. त्यामुळे त्या कुटुंबाने वर्षभर उदरनिर्वाह कसा करावा, अशी समस्या निर्माण झाली आहे.भारत सरकारने १०० दिवस प्रत्येक कुटुंबाला काम देण्याची योजना तयार केली. त्यासाठी कुटुंबाला जॉबकार्ड तयार करायला लावले. जॉबकार्ड तयार करायला लावले. जॉबकार्ड तयार करताना स्पष्ट निर्देश देण्यात आले नसल्याने लाभार्थी कुटुंबाने एकाच जॉबकार्डमध्ये अनेक नावे नोंदविले. त्यामुळे एक पंधरवाडा किंवा तीन आठवडे काम पूर्ण झाले की त्या मजुराला कामावरून बंद केले जात आहे, असेही माजी आ. बन्सोड यांनी सांगितले.गोंदिया व भंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थित आहे. शेतकरी व शेतमजुरांना कामे नाहीत. अशात त्यांनी काय करावे.वर्षभर परिवाराचे भरणपोषण व शैक्षणिक समस्या कशी सोडवावी. अशी समस्या आहे. त्यामुळे शासनाने एका जॉबकार्डवर कमीतकमी २०० किंवा २५० दिवस कामाची सीमा वाढवावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.रोहयो राज्य शासनाचीनरेगा ही भारत सरकारची योजना असून यात १०० दिवस काम देण्याची हमी देण्यात आली आहे. मात्र रोहयो ही राज्य शासनाची योजना असून यात अशी कोणतीही अट नाही. राज्य शासनाने शेतकरी व मजुरांची गंभीर समस्या पाहून जिल्ह्यात रोहयोची कामे करून सरसकट प्रत्येक मजुराला काम मिळेल, अशी योजना तयार करावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.अनेक कुटुंब कामावरून बंदवर्षभरात १०० दिवसांचे कामपूर्ण झाल्याचे सांगून अनेक मजूर कामावरून बंद करण्यात आले. त्यामुळे मजुरांना एप्रिल महिन्यापर्यंत काम मिळणार नाही, अशा परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार शासनाने करावा. कुटुंबावर अन्याय होणार नाही, अशी उपाययोजना करावी.मजुरांसोबत उपोषणाचा इशाराकेंद्र शासनाने आपल्या १०० दिवसांच्या कामाच्या आदेशात किंवा योजनेत बदल करून आपातस्थितीत कामाचा कालावधी वाढविण्यात यावा. तसेच राज्य शासनाने रोहयोच्या कामात वाढ करून मजुरांची समस्या मार्गी लावावी. वर्षभर पुरेल अशी व्यवस्था भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्ह्यांसाठी करावी, अन्यथा मजुरांसह आंदोलन करणार, असा इशारा निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :jobनोकरी