शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

एक जॉबकार्डधारकाला २५० दिवस काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:53 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस कामांच्या ऐवजी २५० दिवस कामाची कालमर्यादा वाढविण्यात यावी,

ठळक मुद्देदिलीप बन्सोड : १०० दिवस कामाचा नियम स्थगित करा

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस कामांच्या ऐवजी २५० दिवस कामाची कालमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसीलदार तिरोडा यांना निवेदन देवून केली आहे.निवेदनानुसार, शासनाने एका कुटुंबात एक जॉबकार्ड तयार केल्यास १०० दिवस काम उपलब्ध करून देण्यात येईल, अशी तरतूद केली. एका जॉबकार्डमध्ये पाच नावे असतील तर २० दिवसच काम एका कुटुंबाला मिळणार आहे. त्यामुळे त्या कुटुंबाने वर्षभर उदरनिर्वाह कसा करावा, अशी समस्या निर्माण झाली आहे.भारत सरकारने १०० दिवस प्रत्येक कुटुंबाला काम देण्याची योजना तयार केली. त्यासाठी कुटुंबाला जॉबकार्ड तयार करायला लावले. जॉबकार्ड तयार करायला लावले. जॉबकार्ड तयार करताना स्पष्ट निर्देश देण्यात आले नसल्याने लाभार्थी कुटुंबाने एकाच जॉबकार्डमध्ये अनेक नावे नोंदविले. त्यामुळे एक पंधरवाडा किंवा तीन आठवडे काम पूर्ण झाले की त्या मजुराला कामावरून बंद केले जात आहे, असेही माजी आ. बन्सोड यांनी सांगितले.गोंदिया व भंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थित आहे. शेतकरी व शेतमजुरांना कामे नाहीत. अशात त्यांनी काय करावे.वर्षभर परिवाराचे भरणपोषण व शैक्षणिक समस्या कशी सोडवावी. अशी समस्या आहे. त्यामुळे शासनाने एका जॉबकार्डवर कमीतकमी २०० किंवा २५० दिवस कामाची सीमा वाढवावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.रोहयो राज्य शासनाचीनरेगा ही भारत सरकारची योजना असून यात १०० दिवस काम देण्याची हमी देण्यात आली आहे. मात्र रोहयो ही राज्य शासनाची योजना असून यात अशी कोणतीही अट नाही. राज्य शासनाने शेतकरी व मजुरांची गंभीर समस्या पाहून जिल्ह्यात रोहयोची कामे करून सरसकट प्रत्येक मजुराला काम मिळेल, अशी योजना तयार करावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.अनेक कुटुंब कामावरून बंदवर्षभरात १०० दिवसांचे कामपूर्ण झाल्याचे सांगून अनेक मजूर कामावरून बंद करण्यात आले. त्यामुळे मजुरांना एप्रिल महिन्यापर्यंत काम मिळणार नाही, अशा परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार शासनाने करावा. कुटुंबावर अन्याय होणार नाही, अशी उपाययोजना करावी.मजुरांसोबत उपोषणाचा इशाराकेंद्र शासनाने आपल्या १०० दिवसांच्या कामाच्या आदेशात किंवा योजनेत बदल करून आपातस्थितीत कामाचा कालावधी वाढविण्यात यावा. तसेच राज्य शासनाने रोहयोच्या कामात वाढ करून मजुरांची समस्या मार्गी लावावी. वर्षभर पुरेल अशी व्यवस्था भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्ह्यांसाठी करावी, अन्यथा मजुरांसह आंदोलन करणार, असा इशारा निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :jobनोकरी