शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:29 IST

घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही पंचायत समिती स्तरावरुन पूर्ण केली जाते. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्ताव पाठवून सुध्दा वर्ष वर्षभर घरकुल मंजूर केले जात नाही. मंजुरी दिली तर त्याचे देयके वेळेवर दिली जात नाही.

ठळक मुद्देपुष्पमाला बडोले : मंजुरीअभावी लाभार्थ्यांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : घरकुलांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ही पंचायत समिती स्तरावरुन पूर्ण केली जाते. मात्र ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्ताव पाठवून सुध्दा वर्ष वर्षभर घरकुल मंजूर केले जात नाही. मंजुरी दिली तर त्याचे देयके वेळेवर दिली जात नाही. लाभार्थी पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवून थकून जातात.त्यामुळे घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायत दिल्यास ही प्रक्रिया जलद गतीने राबविण्यास मदत होईल. शासनाने याचा विचार करुन घरकुल मंजुरीचे अधिकार ग्रामपंचायतला द्यावे अशी मागणी शासनाकडे सरपंच पुष्पमाला बडोले यांनी केली आहे.ग्रामीण भागात आज ही ५० टक्के घरे ही मातीने बांधलेली आहे.सततच्या पावसाने भिंती ओल्या होतात, जीर्ण झालेली घरं पडतात, परिणामी कधी कधी प्राणहानी तर कधी दुखापत होऊन घर पडल्याने त्यांना बेघर होऊन इतर ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो.त्यामुळे बरेच लाभार्थी घरकुल मंजूर करुन घेण्यासाठी सरपंच आणि सदस्यांकडे येतात. मात्र ग्रामपंचायतच्या हातात केवळ प्रस्ताव पाठविणे ऐवढेच असते. घरकुल मंजुरीचे अधिकार हे पंचायत समिती आणि जि.प.ला आहे. मात्र त्यांना गावातील वास्तविक परिस्थिती माहिती नसते, शिवाय कुणाला घरकुलाची गरज आहे अथवा नाही याची सुध्दा कल्पना नसते.त्यामुळे अनेकदा गरजू लाभार्थ्यांवर अन्याय होतो.शिवाय लाभार्थ्यांना वर्षभर त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे ही सर्व परिस्थिती लक्षात घेता घरकुल मंजुरीचे अधिकार हे ग्रामपंचायतला देण्यात यावे अशी मागणी सरपंच पुष्पमाला बडोले यांनी केली आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाgram panchayatग्राम पंचायत