शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पूर्ण वीज द्या, अन्यथा बंद करा

By admin | Updated: April 25, 2017 00:46 IST

विजेच्या कमी दाबामुळे पिकांचे होत असलेले नुकसान व विद्युत विभागाला वारंवार निवेदन देऊनसुध्दा अधिकाऱ्यांना जाग येत नसल्याने...

शेतकऱ्यांचा घेराव : देवरीत महावितरणपुढे धरणे आंदोलन देवरी : विजेच्या कमी दाबामुळे पिकांचे होत असलेले नुकसान व विद्युत विभागाला वारंवार निवेदन देऊनसुध्दा अधिकाऱ्यांना जाग येत नसल्याने शेंडा परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारला विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयाचा घेरात करीत आठ तासांपासून धरणे आंदोलन केले. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत एकाही कर्मचाऱ्याला कार्यालयाबाहेर जाऊ न देण्याची कठोर भूमिका घेतली. सायंकाळी सदर वृत्त लिहीपर्यंत शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरूच होते. सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकरी रबीचे पीक घेत असतात. शेतीमध्ये धान, ऊस, केळी व भाजीपाला मोठ्या प्रमाणात आहे. जर वीज १५ दिवस मिळाली नाही तर संपूर्ण शेती संपुष्टात येईल. वीजेचा कमी दाब असल्याने मोटार पंप चालू होत नाहीत. त्यामुळे शेतीला पाणी द्यायचे कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असून व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे.संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी विद्युत कार्यालयावर धरणे आंदोलन करीत विद्युत विभाग मुर्दाबादचे नारे लावले. ११ पासून तर सायंकाळी ७ पर्यंत आंदोलन सुरूच होते. देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांनी आंदोलनकर्त्यांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला तर परंतु शेतकऱ्यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमीका घेतली होती. अनेक कर्मचारी व अधिकारी वीज कार्यालयात होते. आंदोलनकर्त्यानी कार्यालयाच्या दारावरच ठिय्या आंदोलन मांडले होते. विद्युत विभागाचे काही कर्मचारी शेंडा परिसरात विजेची पाहणी करायला गेल्याचे सांगण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व जि.प.सदस्य सरीता कापगते, देवानंद गहाणे, पवन टेकाम, पं.स.सदस्य गणेश सोनबोईर, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष राजेश चांदेवार, नासीक दसरीया व शेकडो शेतकऱ्यांनी केले. (शहर प्रतिनिधी)अशा आहेत शेतकऱ्यांच्या मागण्याकार्यालयाचा घेराव करीत आंदोलनकर्त्यानी सहायक कार्यकारी अभियंता पी.व्ही.वाघमारे यांना निवेदन देऊन त्वरीत उच्च क्षमतेच्या दाबाचा विद्युत पुरवठा सुरळीत करणे व झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. शेतकऱ्याचे वीजबील पूर्णत: माफ करण्यात यावे, शेतकऱ्यांना येणारे वीज बिल रीडींग घेऊन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. कार्यकारी अभियंता एस.एम.वाकडे हे गैरहजर असल्याने उपकार्यकारी अभियंता वाघमारे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले.