शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

By admin | Updated: October 6, 2016 01:00 IST

तिरोडा तालुक्यातील अनेक गावांत पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्या गावांतील अनेकांची शेती रोवणीपासून वंचितच राहिली.

दिलीप बन्सोड : अनेक शेतजमिनी रोवणीपासून वंचित; हेक्टरी २५ हजारांची मागणीगोंदिया/काचेवानी : तिरोडा तालुक्यातील अनेक गावांत पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्या गावांतील अनेकांची शेती रोवणीपासून वंचितच राहिली. त्यामुळे अशा रोवणी न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने २५ हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली आहे. शेतकरी व बेरोजगार यांना काम, घरकूल व गॅस कनेक्शनचा गरजूंना लाभ द्यावे, निराधार, वृद्धापकाळ व भूमिहिन शेतमजुरांना निर्धारित तारखेला सहाय्य राशी (पेंशन) देणे आणि धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या आशयाचे निवेदन तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे.तिरोडा तालुक्यात नवेझरी, सितेपार, खेडेपार, कोयलारी, कोडेलोहारा, केसलवाडा, येडमाकोट, नवेगाव, लेदडा, कुल्पा, नांदलपार, सिल्ली, माल्ही व सोनेखारी या १४ व इतर काही गावांत पावसाच्या अभावाने रोवणी होवू शकली नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत देवून रबीकरिता मोफत बियाण्यांची सोय करावी, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.शासकीय आधारभूत किमतीवर धान खरेदी केंद्रांची सुरूवात तात्काळ करण्यात यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्रीसेल खरेदी सुरू करण्यात यावी. निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, अपंग, निवृत्ती योजना यासारख्या योजनांच्या आवेदनांवर तलाठी स्वाक्षरी करीत नाहीत. त्यावर स्वाक्षरी करण्याचे आदेश देण्यात यावे. दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आ. बंसोड यांनी केली आहे.सद्यस्थितीत ग्रामपंचायतींमध्ये घरकुलांच्या बोगस याद्या पाठविण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात सदर याद्यांवरून नागरिकांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये तांडव निर्माण झाले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या याद्या निरस्त करून ग्रामसभेद्वारे गरजू लोकांना घरकुलांचा लाभ प्राधान्याने मिळावा, यासाठी नवीन याद्या तयार करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात यावे. गॅस कनेक्शनच्या याद्यासुद्धा रद्द करून शासकीय नियमांनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. धापेवाडा उपसा सिंचनाची लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांना पाणी पुरवावे. वीज खंडित होवू नये यासाठी निधी उपलब्ध असावी, अशी व्यवस्था प्रकल्प अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी बंसोड यांनी केली आहे. (प्रतिनिधी)