शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या

By admin | Updated: October 6, 2016 01:00 IST

तिरोडा तालुक्यातील अनेक गावांत पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्या गावांतील अनेकांची शेती रोवणीपासून वंचितच राहिली.

दिलीप बन्सोड : अनेक शेतजमिनी रोवणीपासून वंचित; हेक्टरी २५ हजारांची मागणीगोंदिया/काचेवानी : तिरोडा तालुक्यातील अनेक गावांत पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्या गावांतील अनेकांची शेती रोवणीपासून वंचितच राहिली. त्यामुळे अशा रोवणी न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने २५ हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली आहे. शेतकरी व बेरोजगार यांना काम, घरकूल व गॅस कनेक्शनचा गरजूंना लाभ द्यावे, निराधार, वृद्धापकाळ व भूमिहिन शेतमजुरांना निर्धारित तारखेला सहाय्य राशी (पेंशन) देणे आणि धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, या आशयाचे निवेदन तिरोड्याचे उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे.तिरोडा तालुक्यात नवेझरी, सितेपार, खेडेपार, कोयलारी, कोडेलोहारा, केसलवाडा, येडमाकोट, नवेगाव, लेदडा, कुल्पा, नांदलपार, सिल्ली, माल्ही व सोनेखारी या १४ व इतर काही गावांत पावसाच्या अभावाने रोवणी होवू शकली नाही. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. शासनाने या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रूपये मदत देवून रबीकरिता मोफत बियाण्यांची सोय करावी, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केली आहे.शासकीय आधारभूत किमतीवर धान खरेदी केंद्रांची सुरूवात तात्काळ करण्यात यावी. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्रीसेल खरेदी सुरू करण्यात यावी. निराधार, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विधवा, अपंग, निवृत्ती योजना यासारख्या योजनांच्या आवेदनांवर तलाठी स्वाक्षरी करीत नाहीत. त्यावर स्वाक्षरी करण्याचे आदेश देण्यात यावे. दिरंगाई व टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी आ. बंसोड यांनी केली आहे.सद्यस्थितीत ग्रामपंचायतींमध्ये घरकुलांच्या बोगस याद्या पाठविण्यात आल्या आहेत. प्रत्येक गावात सदर याद्यांवरून नागरिकांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये तांडव निर्माण झाले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या याद्या निरस्त करून ग्रामसभेद्वारे गरजू लोकांना घरकुलांचा लाभ प्राधान्याने मिळावा, यासाठी नवीन याद्या तयार करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात यावे. गॅस कनेक्शनच्या याद्यासुद्धा रद्द करून शासकीय नियमांनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. धापेवाडा उपसा सिंचनाची लोडशेडिंग बंद करून शेतकऱ्यांना पाणी पुरवावे. वीज खंडित होवू नये यासाठी निधी उपलब्ध असावी, अशी व्यवस्था प्रकल्प अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी बंसोड यांनी केली आहे. (प्रतिनिधी)