शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

शेतकºयांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:32 IST

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.

ठळक मुद्देअग्रवाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना प्रती हेक्टर ३५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.आमदार अग्रवाल यांनी जिल्ह्याचा दौरा करुन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी धान पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. जलाशयांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा असून दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर असून अशा स्थिती शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. हीच बाब हेरून आ.अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.२२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेता डॉ.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांना पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. ५० टक्के झालेल्या रोवण्या संकटात आल्या आहे. तर ५० टक्के रोवणी शिल्लक असून पाऊस न झाल्याने ती देखील वाळत चालली आहे. शेतकºयांनी मोठ्या आशेने व पैशाची जुळवाजुळव करुन खरीपाची तयारी केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून त्याचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली. तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना प्रती हेक्टर ३५ हजार रुपये या प्रमाणे आर्थिक मदत देण्याची मागणी अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्यांवर गांर्भीयाने विचार व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आ.अग्रवाल यांना दिले.उपसा सिंचन योजनेचा विद्युत पुरवठा सुरळीत करापावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजनाचा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच थकीत वीज देयकामुळे खंडीत केलेला कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली.शेतकºयांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज द्यासरकारने थकबाकीदार शेतकºयांना १० हजार रुपयांचे अग्रीम कर्ज उपलब्ध करुन दिले. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकºयांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्ज आणि कर वसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली.