शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

शेतकºयांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:32 IST

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.

ठळक मुद्देअग्रवाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना प्रती हेक्टर ३५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.आमदार अग्रवाल यांनी जिल्ह्याचा दौरा करुन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी धान पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. जलाशयांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा असून दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर असून अशा स्थिती शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. हीच बाब हेरून आ.अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.२२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेता डॉ.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांना पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. ५० टक्के झालेल्या रोवण्या संकटात आल्या आहे. तर ५० टक्के रोवणी शिल्लक असून पाऊस न झाल्याने ती देखील वाळत चालली आहे. शेतकºयांनी मोठ्या आशेने व पैशाची जुळवाजुळव करुन खरीपाची तयारी केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून त्याचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली. तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना प्रती हेक्टर ३५ हजार रुपये या प्रमाणे आर्थिक मदत देण्याची मागणी अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्यांवर गांर्भीयाने विचार व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आ.अग्रवाल यांना दिले.उपसा सिंचन योजनेचा विद्युत पुरवठा सुरळीत करापावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजनाचा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच थकीत वीज देयकामुळे खंडीत केलेला कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली.शेतकºयांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज द्यासरकारने थकबाकीदार शेतकºयांना १० हजार रुपयांचे अग्रीम कर्ज उपलब्ध करुन दिले. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकºयांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्ज आणि कर वसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली.