शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

शेतकºयांना हेक्टरी ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:32 IST

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे.

ठळक मुद्देअग्रवाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना प्रती हेक्टर ३५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.आमदार अग्रवाल यांनी जिल्ह्याचा दौरा करुन पिकांची पाहणी केली. पावसाअभावी धान पीक पूर्णपणे धोक्यात आले आहे. जलाशयांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा असून दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर असून अशा स्थिती शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. हीच बाब हेरून आ.अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.२२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेता डॉ.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांना पावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. ५० टक्के झालेल्या रोवण्या संकटात आल्या आहे. तर ५० टक्के रोवणी शिल्लक असून पाऊस न झाल्याने ती देखील वाळत चालली आहे. शेतकºयांनी मोठ्या आशेने व पैशाची जुळवाजुळव करुन खरीपाची तयारी केली. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकºयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून त्याचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली. तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकºयांना प्रती हेक्टर ३५ हजार रुपये या प्रमाणे आर्थिक मदत देण्याची मागणी अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्यांवर गांर्भीयाने विचार व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन आ.अग्रवाल यांना दिले.उपसा सिंचन योजनेचा विद्युत पुरवठा सुरळीत करापावसाअभावी जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यातील सर्व उपसा सिंचन योजनाचा खंडीत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. तसेच थकीत वीज देयकामुळे खंडीत केलेला कृषीपंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी अग्रवाल यांनी केली.शेतकºयांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज द्यासरकारने थकबाकीदार शेतकºयांना १० हजार रुपयांचे अग्रीम कर्ज उपलब्ध करुन दिले. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकºयांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन द्यावे. कर्ज आणि कर वसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली.