शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्या

By admin | Updated: May 6, 2016 01:33 IST

रेल्वे विभागाच्यावतीने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारणे सुरू असून या प्रकरणी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा

टेंभरे यांची मागणी : रेल्वेचे टॉवरलाईन प्रकरण गोंदिया : रेल्वे विभागाच्यावतीने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारणे सुरू असून या प्रकरणी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा कोणताही जमीनीचा मोबदला न देता टॉवर उभारणे सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असल्याने रेल्वे विभागाने शेतकऱ्यांना जमीनीचा योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान संजय टेंभरे यांनी केली. दरम्यान रेल्वे विभागाने सकारात्मक पावले न उचलल्यास आंदोलनात्मक पवित्राचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रेल्वे विभागाच्यावतीने गोंदिया-चंद्रपूर रेल्वे लाईनकरिता विद्युत पुरवठा करण्यासाठी हिरडामाली येथे विद्युत साठवण केंद्र क्रियान्वित करण्यात आले असून यासाठी गोंदियाच्या एमआयडीसी क्षेत्रातील मुंडीपार येथून विद्युत पुरवठा केला जाणार आहे. यासाठी रेल्वे विभागाने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान तुजलाराम राजाराम दिहारी चुटिया, भाऊराम सखाराम फाये, बुधा मयाराम भगत, शामलाल गोधन बघेले सर्व लोधीटोला, प्रल्हाद चैतराम हरीणखेडे गणखैरा, ओंकार ब्रिजलाल पारधी पुरगाव, गजानन रहांगडाले, राजकुमार रहांगडाले, चंदन पंधरे, रेखा ठाकरे, मनिराम कटरे, नान्हू बागडे सर्व (रा. चिचगाव) तसेच डिगेंद्र रहांगडाले पुरगाव या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.टॉवरचे बांधकाम करताना एक दोन शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून १५ हजार रुपये देण्यात आले. तरी अनेक शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्याचप्रमाणे टॉवरचे बांधकाम होत असताना वडिलोपार्जीत जमीन निरूपयोगी होत असल्याने बाजारभावानुसार शेतमिनीचा मोबदला देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. यासंदर्भात चुटिया व लोधीटोला परिसरातील शेतकऱ्यांनी या विद्युत टॉवरच्या बांधकामाला विरोध दर्शवून बांधकाम थांबविले आहे. दरम्यान टेंभरे यांच्या नेतृत्वात रतन बघेले, उत्तम भगत यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी नागपूर येथील रेल्वे विभागाच्या कार्यालयात डीईई दीनानाथ व डीसी ठाकूर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मात्र रेल्वे विभागाच्यावतीने फक्त पीक नुकसान भरपाई देण्यात येणार, इतर कोणतीही मदत देता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र टेंभरे यांनी शेतकऱ्यांना जोपर्यंत त्यांचा जमिनीचा मोबदला बाजारभावानुसार देणार नाही तोपर्यंत टॉवरचे बांधकाम सुरू होवू देणार नसल्याचे सांगून आंदोलनात्मक पवित्रा घेवून शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)