शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
3
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
6
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
7
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
8
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
9
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
10
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
11
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
12
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
13
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
14
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
15
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
16
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
17
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
18
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
19
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
20
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले

शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्या

By admin | Updated: May 6, 2016 01:33 IST

रेल्वे विभागाच्यावतीने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारणे सुरू असून या प्रकरणी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा

टेंभरे यांची मागणी : रेल्वेचे टॉवरलाईन प्रकरण गोंदिया : रेल्वे विभागाच्यावतीने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारणे सुरू असून या प्रकरणी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा कोणताही जमीनीचा मोबदला न देता टॉवर उभारणे सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असल्याने रेल्वे विभागाने शेतकऱ्यांना जमीनीचा योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान संजय टेंभरे यांनी केली. दरम्यान रेल्वे विभागाने सकारात्मक पावले न उचलल्यास आंदोलनात्मक पवित्राचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रेल्वे विभागाच्यावतीने गोंदिया-चंद्रपूर रेल्वे लाईनकरिता विद्युत पुरवठा करण्यासाठी हिरडामाली येथे विद्युत साठवण केंद्र क्रियान्वित करण्यात आले असून यासाठी गोंदियाच्या एमआयडीसी क्षेत्रातील मुंडीपार येथून विद्युत पुरवठा केला जाणार आहे. यासाठी रेल्वे विभागाने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान तुजलाराम राजाराम दिहारी चुटिया, भाऊराम सखाराम फाये, बुधा मयाराम भगत, शामलाल गोधन बघेले सर्व लोधीटोला, प्रल्हाद चैतराम हरीणखेडे गणखैरा, ओंकार ब्रिजलाल पारधी पुरगाव, गजानन रहांगडाले, राजकुमार रहांगडाले, चंदन पंधरे, रेखा ठाकरे, मनिराम कटरे, नान्हू बागडे सर्व (रा. चिचगाव) तसेच डिगेंद्र रहांगडाले पुरगाव या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.टॉवरचे बांधकाम करताना एक दोन शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून १५ हजार रुपये देण्यात आले. तरी अनेक शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्याचप्रमाणे टॉवरचे बांधकाम होत असताना वडिलोपार्जीत जमीन निरूपयोगी होत असल्याने बाजारभावानुसार शेतमिनीचा मोबदला देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. यासंदर्भात चुटिया व लोधीटोला परिसरातील शेतकऱ्यांनी या विद्युत टॉवरच्या बांधकामाला विरोध दर्शवून बांधकाम थांबविले आहे. दरम्यान टेंभरे यांच्या नेतृत्वात रतन बघेले, उत्तम भगत यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी नागपूर येथील रेल्वे विभागाच्या कार्यालयात डीईई दीनानाथ व डीसी ठाकूर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मात्र रेल्वे विभागाच्यावतीने फक्त पीक नुकसान भरपाई देण्यात येणार, इतर कोणतीही मदत देता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र टेंभरे यांनी शेतकऱ्यांना जोपर्यंत त्यांचा जमिनीचा मोबदला बाजारभावानुसार देणार नाही तोपर्यंत टॉवरचे बांधकाम सुरू होवू देणार नसल्याचे सांगून आंदोलनात्मक पवित्रा घेवून शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)