शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला द्या

By admin | Updated: May 6, 2016 01:33 IST

रेल्वे विभागाच्यावतीने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारणे सुरू असून या प्रकरणी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा

टेंभरे यांची मागणी : रेल्वेचे टॉवरलाईन प्रकरण गोंदिया : रेल्वे विभागाच्यावतीने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारणे सुरू असून या प्रकरणी शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा कोणताही जमीनीचा मोबदला न देता टॉवर उभारणे सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असल्याने रेल्वे विभागाने शेतकऱ्यांना जमीनीचा योग्य तो मोबदला द्यावा, अशी मागणी रेल्वे अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान संजय टेंभरे यांनी केली. दरम्यान रेल्वे विभागाने सकारात्मक पावले न उचलल्यास आंदोलनात्मक पवित्राचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रेल्वे विभागाच्यावतीने गोंदिया-चंद्रपूर रेल्वे लाईनकरिता विद्युत पुरवठा करण्यासाठी हिरडामाली येथे विद्युत साठवण केंद्र क्रियान्वित करण्यात आले असून यासाठी गोंदियाच्या एमआयडीसी क्षेत्रातील मुंडीपार येथून विद्युत पुरवठा केला जाणार आहे. यासाठी रेल्वे विभागाने मुंडीपार ते हिरडामालीदरम्यान तुजलाराम राजाराम दिहारी चुटिया, भाऊराम सखाराम फाये, बुधा मयाराम भगत, शामलाल गोधन बघेले सर्व लोधीटोला, प्रल्हाद चैतराम हरीणखेडे गणखैरा, ओंकार ब्रिजलाल पारधी पुरगाव, गजानन रहांगडाले, राजकुमार रहांगडाले, चंदन पंधरे, रेखा ठाकरे, मनिराम कटरे, नान्हू बागडे सर्व (रा. चिचगाव) तसेच डिगेंद्र रहांगडाले पुरगाव या शेतकऱ्यांच्या शेतात टॉवर लाईनकरिता विद्युत टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे.टॉवरचे बांधकाम करताना एक दोन शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून १५ हजार रुपये देण्यात आले. तरी अनेक शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्याचप्रमाणे टॉवरचे बांधकाम होत असताना वडिलोपार्जीत जमीन निरूपयोगी होत असल्याने बाजारभावानुसार शेतमिनीचा मोबदला देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. यासंदर्भात चुटिया व लोधीटोला परिसरातील शेतकऱ्यांनी या विद्युत टॉवरच्या बांधकामाला विरोध दर्शवून बांधकाम थांबविले आहे. दरम्यान टेंभरे यांच्या नेतृत्वात रतन बघेले, उत्तम भगत यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी नागपूर येथील रेल्वे विभागाच्या कार्यालयात डीईई दीनानाथ व डीसी ठाकूर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मात्र रेल्वे विभागाच्यावतीने फक्त पीक नुकसान भरपाई देण्यात येणार, इतर कोणतीही मदत देता येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र टेंभरे यांनी शेतकऱ्यांना जोपर्यंत त्यांचा जमिनीचा मोबदला बाजारभावानुसार देणार नाही तोपर्यंत टॉवरचे बांधकाम सुरू होवू देणार नसल्याचे सांगून आंदोलनात्मक पवित्रा घेवून शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)