शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या

By admin | Updated: June 6, 2017 00:59 IST

संपूर्ण कर्जमुक्ती या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी विविध राजकीय पक्षांसोबत राज्यभरात ५ जूनला महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण कर्जमुक्ती या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी विविध राजकीय पक्षांसोबत राज्यभरात ५ जूनला महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यातही पडल्याचे दिसून आले. मोर्चे व बाईक रॅली काढून तहसीलदारांना निवेदनेही देण्यात आलीत.गोंदिया : किसान संघटनेद्वारे आज घोषित महाराष्ट्र बंदच्या समर्थनात जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, धानाला तीन हजार रुपये भाव, बोनस, शेतकऱ्यांच्या उत्पादनास लागती नुसार योग्य मुल्य मिळावे व जनसामान्यांच्या विविध मागण्यांचा समावेश होता. याप्रसंगी विनोद हरिणखेडे, छोटू पटले, अशोक शहारे, जितेश टेंभरे, शिव शर्मा, तिर्थराज हरिणखेडे, मनोज डोंगरे, सुनीता मडावी, रमेश गौतम, शैलेष वासनिक, प्रिती रामटेके, पुरनलाल उके, रामकृष्ण गौतम, नाजूक शेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.गोरेगाव : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देवून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी करण्यात आली. यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी केवल बघेले यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. तिरोडा : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर, डॉ. अविनाश जायस्वाल, प्रेम रहांगडाले, पंचम बिसेन, पारधी आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमगाव : तालुका शेतकरी पंचायत व ओबीसी संघर्ष कृती समितीतर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देवून शेतकऱ्यांच्या तीव्र भावना व पडसादसूचक इशारा देण्यात आला. राज्यातील शेतकरी संघटनांनी १ जूनपासून ‘शेतकरी संपावर’ आंदोलन पुकारला असून ५ जूनला महाराष्ट्र बंदचे आंदोलन केले. आजपर्यंतच्या सर्वच शासनाने शेतकऱ्यांना मोठमोठ्या उपाधी दिल्यात. परंतु कृषी मात्र शेतकऱ्यांना उपाशी ठेवून आत्महत्येच्या उंबरठ्यावर नेण्याच्या केल्या. त्यामुळे आता अन्याय पुढे सहन करणार नाही, असा इशारा आमगाव तालुका शेतकरी पंचायतद्वारे ओबीसी संघर्ष कृती समितीतर्फे देण्यात आला. मागण्या तत्काळ मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, तालुकाध्यक्ष कमलबापू बहेकार, जि.प.सदस्य सुखराम फुंडे, सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, टिकाराम मेंढे, विनोद कन्नमवार, तुलेंद्र कटरे, तिरथ येटरे, कविता रहांगडाले, रवि क्षीरसागर, सुनील ब्राम्हणकर, अजय बिसेन, बाबुलाल दोनोडे, देवेंद्र मच्छिरके, नरेंद्र शिवणकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.अर्जुनी मोरगाव : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शेतकऱ्यांसह उपस्थित होते.देवरी : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सडक अर्जुनी : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सालेकसा : सालेकसा तालुका शेतकरी पंचायतद्वारे ओबीसी संघर्ष कृती समिती समर्थित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सोमवारी सकाळी बस स्थानक चौकात मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले. या वेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, धानाला साडेतीन हजार रूपये हमीभाव मिळालाच पाहिजे, ६० वर्षांवरील शेतकरी-शेतमजुरांना पेन्शन मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली व घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटना व ओबीसी संघटना सोमवारपासून जनआंदोलनाच्या स्वरूपात संपावर जात असल्याने शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या व विविध मागण्यांच्या संदर्भात सालेकसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समर्थन करून तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानुसार, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे, तसेच शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसदर्भात पक्षाने पुढाकार घेवून धरणे आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. परंतु शासनाची झोप उघडली नाही. संपूर्ण राज्य शेतकरी कामगार पक्षसुद्धा शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी जनआंदोलन करून शासनाला वेळोवेळी जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांवरच संपावर जाण्याची पाळी आली आहे. शेतकऱ्यांच्या संपाचे समर्थन करीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने घेवून संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. निवेदन देतेवेळी तुकाराम बोहरे, निर्दोष साखरे, निकेश गावड, लक्ष्मण नागपुरे, भरतलाल नागपुरे आदी अनेक शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.