शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चालू वर्षातील बीएड विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेला बसण्याची संधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

गोंदिया : विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बीएड अभ्यासक्रमातील चौथ्या म्हणजेच शेवटच्या सेमिस्टरला असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण ...

गोंदिया : विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बीएड अभ्यासक्रमातील चौथ्या म्हणजेच शेवटच्या सेमिस्टरला असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागातर्फे घेण्यात येत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टाईटी परीक्षेला बसण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे भावी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा नुकसान सहन करावे लागत आहे. अशात त्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्या अशी मागणी विदर्भ स्टुडंट युथ ऑर्गनायझेशनने केली आहे.

कोरोनामुळे आधीच नुकसान झाले आहे. त्यातच महत्वाच्या असलेल्या परीक्षेला न बसू देता सरकार जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती होणार असून त्यासाठी टीईटी परीक्षा हीच गुणवत्ता असणार आहे. अनेक विद्यार्थी कित्येक वर्षांपासून टीईटी परीक्षेची वाट पाहत असून त्याची तयारी सुरू आहे. परीक्षेसाठी ३ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहे. त्यात बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येत असून कोरोनामुळे लांबलेल्या शेवटच्या सेमिस्टरला असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही. त्यामुळे कोरोना काळात लांबलेल्या सत्राचा फटका विनाकारण विद्यार्थ्यांना बसणार आहे. कोरोना नसता तर आतापर्यंत बीएड अभ्यासक्रम पूर्ण झाले असते व ते हजारो विद्यार्थी टीईटी परिक्षेला पात्र असते. त्यामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून या अन्यायाबद्दल शालेय शिक्षण विभागावर रोष आहे.

.........

शिक्षण मंत्र्यांना पाठविले निवेदन

नेट सेट, नीट सारख्या पात्रता किंवा एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेत सुद्धा शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी असताना विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे काम शालेय शिक्षण विभाग करीत आहे. त्यामुळे विदर्भ स्टुडंट अँड युथ असोसिएशनतर्फे नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवून शेवटच्या सेमिस्टरला असलेल्या बीएड च्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेत बसण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

..........

निषेध व आंदोलनाचा इशारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट असल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान न करता शेवटच्या सत्राला असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करू द्यावे. संकेतस्थळावर लवकरात लवकर तशा सूचना द्याव्या व बदल करावे अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना शांत न बसता विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात निषेध व आंदोलन करण्यात येईल असा इशारा विदर्भ स्टुडंट अँड युथ असोसिएशनचे संयोजक अनिकेत मते यांनी दिला आहे.