शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

चालू वर्षातील बीएड विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेला बसण्याची संधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:32 IST

गोंदिया : विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बीएड अभ्यासक्रमातील चौथ्या म्हणजेच शेवटच्या सेमिस्टरला असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण ...

गोंदिया : विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बीएड अभ्यासक्रमातील चौथ्या म्हणजेच शेवटच्या सेमिस्टरला असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण विभागातर्फे घेण्यात येत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टाईटी परीक्षेला बसण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे भावी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा नुकसान सहन करावे लागत आहे. अशात त्यांना परीक्षेला बसण्याची संधी द्या अशी मागणी विदर्भ स्टुडंट युथ ऑर्गनायझेशनने केली आहे.

कोरोनामुळे आधीच नुकसान झाले आहे. त्यातच महत्वाच्या असलेल्या परीक्षेला न बसू देता सरकार जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती होणार असून त्यासाठी टीईटी परीक्षा हीच गुणवत्ता असणार आहे. अनेक विद्यार्थी कित्येक वर्षांपासून टीईटी परीक्षेची वाट पाहत असून त्याची तयारी सुरू आहे. परीक्षेसाठी ३ ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत आहे. त्यात बीएड अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येत असून कोरोनामुळे लांबलेल्या शेवटच्या सेमिस्टरला असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही. त्यामुळे कोरोना काळात लांबलेल्या सत्राचा फटका विनाकारण विद्यार्थ्यांना बसणार आहे. कोरोना नसता तर आतापर्यंत बीएड अभ्यासक्रम पूर्ण झाले असते व ते हजारो विद्यार्थी टीईटी परिक्षेला पात्र असते. त्यामुळे विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून या अन्यायाबद्दल शालेय शिक्षण विभागावर रोष आहे.

.........

शिक्षण मंत्र्यांना पाठविले निवेदन

नेट सेट, नीट सारख्या पात्रता किंवा एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेत सुद्धा शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी असताना विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे काम शालेय शिक्षण विभाग करीत आहे. त्यामुळे विदर्भ स्टुडंट अँड युथ असोसिएशनतर्फे नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शालेय शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवून शेवटच्या सेमिस्टरला असलेल्या बीएड च्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेत बसण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

..........

निषेध व आंदोलनाचा इशारा

अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट असल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान न करता शेवटच्या सत्राला असलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करू द्यावे. संकेतस्थळावर लवकरात लवकर तशा सूचना द्याव्या व बदल करावे अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा विदर्भातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना शांत न बसता विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यात निषेध व आंदोलन करण्यात येईल असा इशारा विदर्भ स्टुडंट अँड युथ असोसिएशनचे संयोजक अनिकेत मते यांनी दिला आहे.