शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगाव तालुका कृषी क्षेत्रात होणार ‘हायटेक’

By admin | Updated: June 14, 2014 23:41 IST

आसमानी संकट, अतिवृष्टी, निविष्ठा व मजुरांचे वाढीव दर या समस्यांवर मात करीत येथील शंभराच्यावर शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाल्याच्या शेतीला अधिक पसंती दिली आहे. तालुक्यातील ही फळबाग शेती

पारंपरिक शेतीला बगल : शेतकरी वळले नगदी पिकाकडेदिलीप चव्हाण - गोरेगावआसमानी संकट, अतिवृष्टी, निविष्ठा व मजुरांचे वाढीव दर या समस्यांवर मात करीत येथील शंभराच्यावर शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाल्याच्या शेतीला अधिक पसंती दिली आहे. तालुक्यातील ही फळबाग शेती आधुनिक पद्धतीने घेतली जात असून गोरेगाव तालुक्याची कृषी क्षेत्रात ‘हायटेक’ होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे.या भागातील शेतकरी पिठ्यान्पिठ्या धान शेती करीत आहे. मात्र या शेतीत शेतकऱ्यांना हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. बहुतेक वेळा लागवड खर्चही निघणे कठिण होते. यावर मात करण्यासाठी शेतकरी फळबाग शेतीकडे वळत आहेत. या शेतीतून शेतकऱ्यांना लाखोच्या घरात कमाई होण्याची आशा निर्माण झाली आहे.तालुक्यातील बबई येथील अभियंता रवी बघेले यांनी आपल्या शेतात चार एकरमध्ये काकडीची शेती लावली आहे. या काकडीच्या शेतीतून बघेले यांना महिन्याकाठी ८० हजारांचा फायदा होतो. दरदिवशी बघेले गोंदियाच्या बाजारपेठेत काकडी विकायला पाठवितात. प्रत्येक दिवशी २० ते ५० क्विंटल काकडी निघते. डव्वा येथील शिवा बघेले या तरुण शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतीमध्ये हंगामानुसार बागायती शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यांनी तीन एकरात, काकडी, लवकी, कारले, कोहळा, चवळीच्या शेंगा इत्यादी भाजीपाल्याचे उत्पादन केले आहे. या उत्पादनातून लाखो रुपये कमविले. कटंगी येथील फणिंद्र हरिणखेडे यांनी दोन एकरमध्ये फळबाग लागवड केली आहे. गोरेगाव येथील सुरेंद्र दिनदयाल पटले, दिनदयाल छगनलाल पटले यांनी ५ एकरमध्ये काकडीचे पिक लावले आहे. मसगाव येथील बोपचे, पटले, झांजीया येथे श्रीराम अग्रवाल, पलखेडा येथील आलोक सोलंकी, सुरेंद्र सोलंकी, मोहगाव बुज. येथील मुक्ता केवाडे यांनी अडीच एकरात पपई तर अडीच एकरात भाजीपाला लावला आहे. तिमेझरी येथील पटले यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली आहे. यातून पटले यांना लाखोंचे उत्पादन मिळाले आहे. गोरेगाव येथील डॉ. रुस्तम येडे यांनी आपल्या पाच एकरात भेंडी, गवार, चवळीच्या शेंगा, वांगी, कोबी, कारले, काकडी इत्यादीचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. या शेतकऱ्यांना ‘हायटेक’ शेतीकडे वळविण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. तालुक्यातील सोनेगाव, भंडगा, पालेवाडा, कटंगी, मोहगाव, म्हसगाव या गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असे नाविन्यपूर्ण भाजीपाला प्रक्षेत्र तयार करून रोजगाराच्या संधी कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र स्पर्धात्मक शेती प्रकल्पांतर्गत अनुदानावर शेतकऱ्यांना भाजीपाला वाहून नेणारी ट्रॉली व भाजीपाला कॅरेट्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले असून शेतकरी त्याचा लाभ घेताना दिसत आहे.शहरी भागाकरिता भाजीपाला विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात तालुक्यात भाजीपाला उत्पादकांचे गट निर्माण करणे, जाळे तयार करणे, ठिबक सिंचन, प्लास्टिकल्चर इत्यादी सोयी अनुदान तत्वावर उपलब्ध करून देणे या बाबीवर विशेष भर दिला जात आहे. तालुक्यात ‘आत्मा’ योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सभेमध्ये दिशादर्शक माहिती देवून कृषी क्षेत्रात गोरेगाव तालुक्याला वेगळ्या दिशेने नेण्यासाठी कृषी अधिकारी मंगेश वावधने परिश्रम घेत आहेत.