शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

गोरेगाव तालुका कृषी क्षेत्रात होणार ‘हायटेक’

By admin | Updated: June 14, 2014 23:41 IST

आसमानी संकट, अतिवृष्टी, निविष्ठा व मजुरांचे वाढीव दर या समस्यांवर मात करीत येथील शंभराच्यावर शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाल्याच्या शेतीला अधिक पसंती दिली आहे. तालुक्यातील ही फळबाग शेती

पारंपरिक शेतीला बगल : शेतकरी वळले नगदी पिकाकडेदिलीप चव्हाण - गोरेगावआसमानी संकट, अतिवृष्टी, निविष्ठा व मजुरांचे वाढीव दर या समस्यांवर मात करीत येथील शंभराच्यावर शेतकऱ्यांनी फळबाग व भाजीपाल्याच्या शेतीला अधिक पसंती दिली आहे. तालुक्यातील ही फळबाग शेती आधुनिक पद्धतीने घेतली जात असून गोरेगाव तालुक्याची कृषी क्षेत्रात ‘हायटेक’ होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे.या भागातील शेतकरी पिठ्यान्पिठ्या धान शेती करीत आहे. मात्र या शेतीत शेतकऱ्यांना हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. बहुतेक वेळा लागवड खर्चही निघणे कठिण होते. यावर मात करण्यासाठी शेतकरी फळबाग शेतीकडे वळत आहेत. या शेतीतून शेतकऱ्यांना लाखोच्या घरात कमाई होण्याची आशा निर्माण झाली आहे.तालुक्यातील बबई येथील अभियंता रवी बघेले यांनी आपल्या शेतात चार एकरमध्ये काकडीची शेती लावली आहे. या काकडीच्या शेतीतून बघेले यांना महिन्याकाठी ८० हजारांचा फायदा होतो. दरदिवशी बघेले गोंदियाच्या बाजारपेठेत काकडी विकायला पाठवितात. प्रत्येक दिवशी २० ते ५० क्विंटल काकडी निघते. डव्वा येथील शिवा बघेले या तरुण शेतकऱ्याने आपल्या तीन एकर शेतीमध्ये हंगामानुसार बागायती शेतीला प्राधान्य दिले आहे. त्यांनी तीन एकरात, काकडी, लवकी, कारले, कोहळा, चवळीच्या शेंगा इत्यादी भाजीपाल्याचे उत्पादन केले आहे. या उत्पादनातून लाखो रुपये कमविले. कटंगी येथील फणिंद्र हरिणखेडे यांनी दोन एकरमध्ये फळबाग लागवड केली आहे. गोरेगाव येथील सुरेंद्र दिनदयाल पटले, दिनदयाल छगनलाल पटले यांनी ५ एकरमध्ये काकडीचे पिक लावले आहे. मसगाव येथील बोपचे, पटले, झांजीया येथे श्रीराम अग्रवाल, पलखेडा येथील आलोक सोलंकी, सुरेंद्र सोलंकी, मोहगाव बुज. येथील मुक्ता केवाडे यांनी अडीच एकरात पपई तर अडीच एकरात भाजीपाला लावला आहे. तिमेझरी येथील पटले यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये पपईची लागवड केली आहे. यातून पटले यांना लाखोंचे उत्पादन मिळाले आहे. गोरेगाव येथील डॉ. रुस्तम येडे यांनी आपल्या पाच एकरात भेंडी, गवार, चवळीच्या शेंगा, वांगी, कोबी, कारले, काकडी इत्यादीचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. या शेतकऱ्यांना ‘हायटेक’ शेतीकडे वळविण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. तालुक्यातील सोनेगाव, भंडगा, पालेवाडा, कटंगी, मोहगाव, म्हसगाव या गावात शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असे नाविन्यपूर्ण भाजीपाला प्रक्षेत्र तयार करून रोजगाराच्या संधी कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. महाराष्ट्र स्पर्धात्मक शेती प्रकल्पांतर्गत अनुदानावर शेतकऱ्यांना भाजीपाला वाहून नेणारी ट्रॉली व भाजीपाला कॅरेट्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले असून शेतकरी त्याचा लाभ घेताना दिसत आहे.शहरी भागाकरिता भाजीपाला विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात तालुक्यात भाजीपाला उत्पादकांचे गट निर्माण करणे, जाळे तयार करणे, ठिबक सिंचन, प्लास्टिकल्चर इत्यादी सोयी अनुदान तत्वावर उपलब्ध करून देणे या बाबीवर विशेष भर दिला जात आहे. तालुक्यात ‘आत्मा’ योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सभेमध्ये दिशादर्शक माहिती देवून कृषी क्षेत्रात गोरेगाव तालुक्याला वेगळ्या दिशेने नेण्यासाठी कृषी अधिकारी मंगेश वावधने परिश्रम घेत आहेत.