शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

भूत, भानामती, जादू अस्तित्वात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 21:29 IST

वैज्ञानिक दृष्टिकोणातून माणसाने वागावे. जगात जादूने काहीही करता येत नाही. बाबा लोक नारळ व लिंबूचा वापर करून भूत उतरविण्याचे काम करीत असल्याचे भासवतात.

ठळक मुद्देप्रकाश धोटे : घाटकुरोडा येथे शारदोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : वैज्ञानिक दृष्टिकोणातून माणसाने वागावे. जगात जादूने काहीही करता येत नाही. बाबा लोक नारळ व लिंबूचा वापर करून भूत उतरविण्याचे काम करीत असल्याचे भासवतात. परंतु जगात भूत, भानामती व जादू अस्तित्वात नाही, प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे यांनी केले.ते घाटकुरोडा येथील महिला शारदा उत्सव मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी अंनिसचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे होते. अतिथी म्हणून तालुका संघटक डी.आर. गिरीपुंजे, जेष्ठ कार्यकर्ते फ.रा. काटवले, एस. बांते उपस्थित होते.या वेळी प्रा. प्रकाश धोटे यांनी लिंबातून रक्त काढणे, चुन्याचा गुलाल बनविणे, कानाने चिठ्ठ्या वाचणे, पाण्याने दिवा पेटविणे असे अनेक वैज्ञानिक प्रयोग करून दाखविले. तर डी.आर. गिरीपुंजे यांनी जादूटोण्याच्या संशयावरून पीडित लोकांची सुटका कशी केली, भूत कसे नसतात याचे स्वत: घेतलेले अनुभव व्यक्त केले. तसेच काटवले यांनी नारळातून विविध वस्तू काढणे, अशा विविध प्रयोगातून मार्गदर्शन केले. संचालन शैलेश खंगार यांनी केले. प्रास्ताविक राहुल डोंगरवार यांनी मांडले. आभार पप्पू मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी मंडळाच्या अध्यक्ष गीता मेश्राम, शांता मेश्राम, शामलता मेश्राम, संजय खंगार, प्रेमलाल उकेटेके, राकेश खंगार, स्वप्नील खंगार, अंकित मेश्राम, रविंद्र खंगार, संतोष खंगार, राकेश भेलावे, सचिन खंगार यांनी सहकार्य केले.