शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

संजयनगरवासीयांना पट्टे मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:38 IST

संजयनगरात राहत असलेले नागरिक अतिक्रमणकर्ते म्हटले जाऊ नये, त्यांनाही सन्मानपूर्वक येथे रहावे यासाठी त्यांना त्यांच्या जागेचे स्थायी पट्टे मिळवून देणे आपले ध्येय आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : संजयनगरात पार पडली आमसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संजयनगरात राहत असलेले नागरिक अतिक्रमणकर्ते म्हटले जाऊ नये, त्यांनाही सन्मानपूर्वक येथे रहावे यासाठी त्यांना त्यांच्या जागेचे स्थायी पट्टे मिळवून देणे आपले ध्येय आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा व प्रयत्न सुरू असून आता पट्टे मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.शहरातील संजयनगर परिसरातीलरिवासी नागरिकांना स्थायी पट्टे देण्यात यावे या विषयाला घेऊन सोमवारी (दि.९) घेण्यात आलेल्या शहरात प्रथमच आयोजित आमसभेत ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, येथील नागरिकांच्या पट्ट्यांच्या विषयात सर्वच संबंधीत अधिकारी व शासकीय विभागांनी आपापल्या प्रकारे अडचणी उभ्या केल्या. पट्टे मिळावे या आदेशावर विविध प्रकारचे नियम लावून अडविले. मात्र आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीत. हा परिसर झुडपी जंगल कायद्यातून मुक्त करण्याचा ठराव घेतल्यानंतर प्रस्ताव राज्य शासनाकडे व तेथून केंद्र शासनाला पाठविला जाईल. केंद्र शासनाकडून हा परिसर झुडपी जंगल क्षेत्रातून मुक्त करण्याची मंजुरी आम्ही निश्चितच आणणार. त्यानंतर राज्य शासनाकडून परिसरातील नागरिकांना स्थायी पट्टे देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही आमदार अग्रवाल यांनी सांगीतले.याप्रसंगी सामाजीक कार्यकर्ता देवा रूसे यांनी, संजयनगरवासीयांना स्थायी पट्टे मिळावे यासाठी आमदार अग्रवाल कित्येक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. यासाठी घरांचे नकाशे तयार करुन स्थायी पट्टे देण्याची कारवाही सुरू असल्याचे सांगीतले. प्रास्तावीक नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी मांडले. सभेला नगराध्यक्ष अशोक इंगळे, नगरसेविका दिपीका रूसे, नगरसेवक भागवत मेश्राम, सुनील तिवारी, तहसीलदार मेश्राम, अनिल डोंगरे, बिट्टू खान, साजन गजभिये, नितीन डोंगरे, अजय मोरे, मनिष रामटेके, आकाश मिश्रा, भिमदास उके, उत्तम भुजाडे, संजय गवळी, सुभान मौलाना, घनश्याम बावनथडे, अनिल बांगडे, सुशांत बंसोड, निळाजी चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.स्थायी पट्टे देण्याचा ठराव पारितशहराच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या संजयनगर येथील आमसभेत नागरिकांनी परिसर झुडपी जंगल कायद्यातून मुक्त करून येथील रहिवाशी नागरिकांना स्थायी पट्टे देण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. जवळपास ६०० नागरिकांना भविष्यात याचा फायदा होणार आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल