शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

संजयनगरवासीयांना पट्टे मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 00:38 IST

संजयनगरात राहत असलेले नागरिक अतिक्रमणकर्ते म्हटले जाऊ नये, त्यांनाही सन्मानपूर्वक येथे रहावे यासाठी त्यांना त्यांच्या जागेचे स्थायी पट्टे मिळवून देणे आपले ध्येय आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : संजयनगरात पार पडली आमसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संजयनगरात राहत असलेले नागरिक अतिक्रमणकर्ते म्हटले जाऊ नये, त्यांनाही सन्मानपूर्वक येथे रहावे यासाठी त्यांना त्यांच्या जागेचे स्थायी पट्टे मिळवून देणे आपले ध्येय आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा व प्रयत्न सुरू असून आता पट्टे मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.शहरातील संजयनगर परिसरातीलरिवासी नागरिकांना स्थायी पट्टे देण्यात यावे या विषयाला घेऊन सोमवारी (दि.९) घेण्यात आलेल्या शहरात प्रथमच आयोजित आमसभेत ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, येथील नागरिकांच्या पट्ट्यांच्या विषयात सर्वच संबंधीत अधिकारी व शासकीय विभागांनी आपापल्या प्रकारे अडचणी उभ्या केल्या. पट्टे मिळावे या आदेशावर विविध प्रकारचे नियम लावून अडविले. मात्र आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीत. हा परिसर झुडपी जंगल कायद्यातून मुक्त करण्याचा ठराव घेतल्यानंतर प्रस्ताव राज्य शासनाकडे व तेथून केंद्र शासनाला पाठविला जाईल. केंद्र शासनाकडून हा परिसर झुडपी जंगल क्षेत्रातून मुक्त करण्याची मंजुरी आम्ही निश्चितच आणणार. त्यानंतर राज्य शासनाकडून परिसरातील नागरिकांना स्थायी पट्टे देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही आमदार अग्रवाल यांनी सांगीतले.याप्रसंगी सामाजीक कार्यकर्ता देवा रूसे यांनी, संजयनगरवासीयांना स्थायी पट्टे मिळावे यासाठी आमदार अग्रवाल कित्येक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. यासाठी घरांचे नकाशे तयार करुन स्थायी पट्टे देण्याची कारवाही सुरू असल्याचे सांगीतले. प्रास्तावीक नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी मांडले. सभेला नगराध्यक्ष अशोक इंगळे, नगरसेविका दिपीका रूसे, नगरसेवक भागवत मेश्राम, सुनील तिवारी, तहसीलदार मेश्राम, अनिल डोंगरे, बिट्टू खान, साजन गजभिये, नितीन डोंगरे, अजय मोरे, मनिष रामटेके, आकाश मिश्रा, भिमदास उके, उत्तम भुजाडे, संजय गवळी, सुभान मौलाना, घनश्याम बावनथडे, अनिल बांगडे, सुशांत बंसोड, निळाजी चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.स्थायी पट्टे देण्याचा ठराव पारितशहराच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या संजयनगर येथील आमसभेत नागरिकांनी परिसर झुडपी जंगल कायद्यातून मुक्त करून येथील रहिवाशी नागरिकांना स्थायी पट्टे देण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. जवळपास ६०० नागरिकांना भविष्यात याचा फायदा होणार आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल