शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘त्या’ २६ कोटींचा मार्ग मोकळा

By admin | Updated: March 22, 2017 01:13 IST

५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झालेल्या नोटा ...

जुन्या नोटा भरता येणार : जिल्हा बँकेचे टेंशन हलके, मात्र आदेशाची प्रतीक्षा गोंदिया : ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झालेल्या नोटा स्वीकरण्यावरील निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तिजोरीत पडून असलेल्या २६ कोटींच्या जुन्या नोटांचा संबंधित बँकांच्या करंसी चेस्टमध्ये भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेचे टेंशन बरेच हलके झाले असले तरी अद्याप त्यांना त्या निर्णयाबाबतचे पत्र मिळालेले नाहीत. केंद्र शासनाने नोव्हेंबर महिन्यात ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनबाद करण्याचा निर्णय घेतला. अचानक घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या या निर्णयामुळे अवघ्या देशातच खळबळ माजली होती. सुरूवातीच्या काळात नागरिकांना या नोटा भरण्यासाठी बँकांपुढे रांगा लावाव्या लागल्या होत्या. नव्या नोटा आल्याने एटीएम सेवा सुद्धा विस्कळीत झाली होती व पैसे काढणे आणि पैसे टाकणे ही एक डोकेदुखी ठरू लागली होती. यातच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यानुसार रद्द केलेल्या या नोटा बँकांद्वारे करंसी चेस्टमध्ये स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे या बँकांकडे मागील चार महिन्यांपासून नोटा पडून होत्या. याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहक व प्रामुख्याने शेतकऱ्यांना बसत होता. सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला या बँकांमधील खात्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेला तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र नाबार्डकडून त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याने पुढील कारवाई थांबली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत व माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची नवी दिल्लीत भेट घेऊन जिल्हा बँकेवरील हे निर्बंध मागे घेण्याबद्दल चर्चा केली. यात जिल्हा बँकांची वस्तूस्थिती मांडत जिल्हा बँकांचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज व अन्य आर्थिक मदत मिळणे कठीण झाल्याचे चित्र स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकांवरील निर्बंध मागे घेऊन त्यांच्याकडील रद्द करण्यात आलेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा करंसी चेस्टमध्ये स्वीकारण्याचे ठरले. (शहर प्रतिनिधी) व्याज भरण्याचा प्रश्न नोटाबंदी होऊन आता चार महिन्यांचा काळ लोटला आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या तब्बल २५ कोटी ४८ लाख १४ हजार ५०० रूपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँकेत जमा झाल्या नाहीत. त्यामुळे बँकेला दररोज २८ हजार रूपयांचे व्याज भरावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांत असा एकूण ३३ लाख ६० हजार रूपयांचा भुर्दंड जिल्हा बँकेला बसला आहे. आता हे व्याज कोण भरून देणार? असा प्रश्न उभा झाला आहे.