शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

‘त्या’ २६ कोटींचा मार्ग मोकळा

By admin | Updated: March 22, 2017 01:13 IST

५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झालेल्या नोटा ...

जुन्या नोटा भरता येणार : जिल्हा बँकेचे टेंशन हलके, मात्र आदेशाची प्रतीक्षा गोंदिया : ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जमा झालेल्या नोटा स्वीकरण्यावरील निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तिजोरीत पडून असलेल्या २६ कोटींच्या जुन्या नोटांचा संबंधित बँकांच्या करंसी चेस्टमध्ये भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँकेचे टेंशन बरेच हलके झाले असले तरी अद्याप त्यांना त्या निर्णयाबाबतचे पत्र मिळालेले नाहीत. केंद्र शासनाने नोव्हेंबर महिन्यात ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनबाद करण्याचा निर्णय घेतला. अचानक घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या या निर्णयामुळे अवघ्या देशातच खळबळ माजली होती. सुरूवातीच्या काळात नागरिकांना या नोटा भरण्यासाठी बँकांपुढे रांगा लावाव्या लागल्या होत्या. नव्या नोटा आल्याने एटीएम सेवा सुद्धा विस्कळीत झाली होती व पैसे काढणे आणि पैसे टाकणे ही एक डोकेदुखी ठरू लागली होती. यातच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यानुसार रद्द केलेल्या या नोटा बँकांद्वारे करंसी चेस्टमध्ये स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे या बँकांकडे मागील चार महिन्यांपासून नोटा पडून होत्या. याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहक व प्रामुख्याने शेतकऱ्यांना बसत होता. सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला या बँकांमधील खात्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेला तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र नाबार्डकडून त्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याने पुढील कारवाई थांबली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत व माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची नवी दिल्लीत भेट घेऊन जिल्हा बँकेवरील हे निर्बंध मागे घेण्याबद्दल चर्चा केली. यात जिल्हा बँकांची वस्तूस्थिती मांडत जिल्हा बँकांचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना पीक कर्ज व अन्य आर्थिक मदत मिळणे कठीण झाल्याचे चित्र स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकांवरील निर्बंध मागे घेऊन त्यांच्याकडील रद्द करण्यात आलेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा करंसी चेस्टमध्ये स्वीकारण्याचे ठरले. (शहर प्रतिनिधी) व्याज भरण्याचा प्रश्न नोटाबंदी होऊन आता चार महिन्यांचा काळ लोटला आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या तब्बल २५ कोटी ४८ लाख १४ हजार ५०० रूपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँकेत जमा झाल्या नाहीत. त्यामुळे बँकेला दररोज २८ हजार रूपयांचे व्याज भरावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांत असा एकूण ३३ लाख ६० हजार रूपयांचा भुर्दंड जिल्हा बँकेला बसला आहे. आता हे व्याज कोण भरून देणार? असा प्रश्न उभा झाला आहे.