शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 01:30 IST

तालुक्यातील ग्राम बाघोली येथील नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून विना परवानगी पांदणरस्ता तयार करण्यात आला.

दोषींवर कारवाई करा : शेतकरी पटले यांचा आत्मदहनाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : तालुक्यातील ग्राम बाघोली येथील नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून विना परवानगी पांदणरस्ता तयार करण्यात आला. हा पांदण रस्ता रेकॉर्ड वर नसताना व शेतकऱ्यांना याची गरज नसताना कुठलाही मोबदला न देता तयार करण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर या कामावर न जाणाऱ्या मजुरांची नावे टाकून शासनाच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत दोषींवर १९ मे पर्यंत कार्यवाही करा अन्यथा २० मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी रुपचंद पटले यांनी मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. बाघोली येथील शेतकरी मंगरु राणे ते इंद्रराज पटले यांच्या शेतापर्यंत मे २०१६ मध्ये मग्रारोहयो अंतर्गत पांदणरस्ता तयार करण्यात आला. रेकॉर्डमध्ये या पांदण रस्त्याची नोंद नाही. यापुर्वी यांच्याच शेतातून कालवा गेला व आता पांदन रस्ता गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे तीन तुकडे झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. पांदनरस्त्याचे काम सुरु होताच शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये काम बंद करावे अशी तक्रार नोंदवून सुद्धा दखल घेण्यात आली नाही व रस्ता पूर्ण करण्यात आला. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी अनेक तक्रारी करुन मोबदला मागितला. या कामात शेतकऱ्यांच्या घरच्या व गावातील कामावर न जाणाऱ्या २० ते २५ मजुरांची नावे घालून त्यांना बँक खात्यावर जमा झालेली मजुरी परत मागण्यात आली व शासनाच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला. ही बाब अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा ग्राम रोजगार सेवकावर अंगणवाडी मदतनीसच्या नावाने सात हजार २१४ रुपये काढल्याचा ठपका ठेऊनही रक्कम वसूल करुन ग्रामसभेच्या माध्यमाने कार्यवाहीचा आदेश देण्यात आला. पण या कामावर झालेला मोठा भ्रष्टाचार दाबल्याचा प्रयत्न उघडपणे दिसून सुद्धा प्रकरणात डोळे झाक होत आहे. यात नऊ शेतकऱ्यापैकी मंगरु चन्ने, नारायण राणे, जायाबाई सोनवाने, रुपचंद हरिचंद पटले, देवचंद हरिचंद पटले, रामचंद पटले, अनंतराम पटले, इंद्रराज पटले या आठ शेतकऱ्यांनी आपल्या गेलेल्या जमिनीचा मोबदला मागितला पण संबंधित अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करीत असून थातूर-मातूर चौकशी करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. शासनाने मजुरांना काम मिळावे म्हणून मग्रारोहयोची कामे सुरु करुन नियमाच्या अधीन राहून कामे सुरु करण्याचा आदेश असताना सुद्धा नियम व कायद्याला डावलून मग्रारहोयोची कामे धडाक्यात सुरु आहे. यात कामावर भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे शासनाचा निधी व्यर्थ वाया जात आहे. असाही आरोप त्यांनी केला आहे. यासर्व कामाची पुन्हा चौकशी आयुक्तामार्फत शेतकरी व गावकऱ्यांपुढे क रून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दयावा व दोषींवर कार्यवाही करावी असे निवेदन मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांना देण्यात आले. कार्यवाही न झाल्यास २० मे ला आत्मदहन करणार असा शेतकरी पटले यांनी इशारा दिला आहे.