शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 01:30 IST

तालुक्यातील ग्राम बाघोली येथील नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून विना परवानगी पांदणरस्ता तयार करण्यात आला.

दोषींवर कारवाई करा : शेतकरी पटले यांचा आत्मदहनाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क गोरेगाव : तालुक्यातील ग्राम बाघोली येथील नऊ शेतकऱ्यांच्या शेतातून विना परवानगी पांदणरस्ता तयार करण्यात आला. हा पांदण रस्ता रेकॉर्ड वर नसताना व शेतकऱ्यांना याची गरज नसताना कुठलाही मोबदला न देता तयार करण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर या कामावर न जाणाऱ्या मजुरांची नावे टाकून शासनाच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत दोषींवर १९ मे पर्यंत कार्यवाही करा अन्यथा २० मे रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी रुपचंद पटले यांनी मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. बाघोली येथील शेतकरी मंगरु राणे ते इंद्रराज पटले यांच्या शेतापर्यंत मे २०१६ मध्ये मग्रारोहयो अंतर्गत पांदणरस्ता तयार करण्यात आला. रेकॉर्डमध्ये या पांदण रस्त्याची नोंद नाही. यापुर्वी यांच्याच शेतातून कालवा गेला व आता पांदन रस्ता गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे तीन तुकडे झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. पांदनरस्त्याचे काम सुरु होताच शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीमध्ये काम बंद करावे अशी तक्रार नोंदवून सुद्धा दखल घेण्यात आली नाही व रस्ता पूर्ण करण्यात आला. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी अनेक तक्रारी करुन मोबदला मागितला. या कामात शेतकऱ्यांच्या घरच्या व गावातील कामावर न जाणाऱ्या २० ते २५ मजुरांची नावे घालून त्यांना बँक खात्यावर जमा झालेली मजुरी परत मागण्यात आली व शासनाच्या निधीचा दुरुपयोग करण्यात आला. ही बाब अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा ग्राम रोजगार सेवकावर अंगणवाडी मदतनीसच्या नावाने सात हजार २१४ रुपये काढल्याचा ठपका ठेऊनही रक्कम वसूल करुन ग्रामसभेच्या माध्यमाने कार्यवाहीचा आदेश देण्यात आला. पण या कामावर झालेला मोठा भ्रष्टाचार दाबल्याचा प्रयत्न उघडपणे दिसून सुद्धा प्रकरणात डोळे झाक होत आहे. यात नऊ शेतकऱ्यापैकी मंगरु चन्ने, नारायण राणे, जायाबाई सोनवाने, रुपचंद हरिचंद पटले, देवचंद हरिचंद पटले, रामचंद पटले, अनंतराम पटले, इंद्रराज पटले या आठ शेतकऱ्यांनी आपल्या गेलेल्या जमिनीचा मोबदला मागितला पण संबंधित अधिकारी व कर्मचारी टाळाटाळ करीत असून थातूर-मातूर चौकशी करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे. शासनाने मजुरांना काम मिळावे म्हणून मग्रारोहयोची कामे सुरु करुन नियमाच्या अधीन राहून कामे सुरु करण्याचा आदेश असताना सुद्धा नियम व कायद्याला डावलून मग्रारहोयोची कामे धडाक्यात सुरु आहे. यात कामावर भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे शासनाचा निधी व्यर्थ वाया जात आहे. असाही आरोप त्यांनी केला आहे. यासर्व कामाची पुन्हा चौकशी आयुक्तामार्फत शेतकरी व गावकऱ्यांपुढे क रून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दयावा व दोषींवर कार्यवाही करावी असे निवेदन मुख्यमंत्री व अधिकाऱ्यांना देण्यात आले. कार्यवाही न झाल्यास २० मे ला आत्मदहन करणार असा शेतकरी पटले यांनी इशारा दिला आहे.