शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘कचरागाडी’ बनल्या जनजागृतीचे माध्यम

By admin | Updated: October 3, 2016 01:30 IST

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहर स्वच्छ होणार नसून प्रत्येकाचा यासाठी सहभाग आवश्यक आहे.

गाड्यांना लावले ‘म्युझिक सिस्टम’ : स्वच्छता जनजागृतीसाठी पालिकेचा प्रयोग कपिल केकत  गोंदियानगर परिषद कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शहर स्वच्छ होणार नसून प्रत्येकाचा यासाठी सहभाग आवश्यक आहे. करिता शहरवासीयांत जाणीव व उत्साह निर्माण करीत जनजागृती व्हावी या उद्देशातून नगर परिषदेने आपल्या कचरागाडींना ‘म्युझिक सिस्टम’ लावले आहेत. स्वच्छतेचा संदेश देणारी गीते या ‘म्युझिक सिस्टम’वर सुरू असतात. नगर परिषदेच्या या नव्या प्रयोगाचे शहरवासीयांकडून कौतूक होत असल्याचेही दिसून आले. आपला परिसर स्वच्छ असावा या उद्देशातून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला जात आहे. महात्मा गांधींच्या जयंतीचे निमित्त साधून देशात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह सामाजीक संघटना, शाळा-महाविद्यालय व सामान्य नागरिकांचा सहभाग लाभत आहे. या स्वच्छता अभियानांतर्गत नगर परिषदेक डून २६ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता आठवडाही साजरा करण्यात आला. दरम्यान स्वच्छचा अभियानाचे हे दुसरे वर्ष असल्याने यंदाही रविवारी (दि.२) नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे हे नागरिकांच्या मनावर ठासवून देण्याची गरज आहे. यासाठी त्यांच्यात जाणीव व उत्साह निर्माण करण्याची गरज आहे. याकरिताच शासनाने लोकांत जनजागृती करता यावी यासाठी संगीत एक माध्यम म्हणून निवडले. त्यानुसार नगर परिषदेने त्यांच्याकडील कचरागाड्यांना ‘म्युझिक सिस्टम’ लावले असून या कचरागाड्या आता जनजागृतीचे माध्यम बनल्या आहेत. या कचरागाड्या शहरात निघत असताना त्यात सरू असलेली स्वच्छतेचा संदेश देणारी गीते नागरिकांना आकर्षित करीत आहेत. यातून नागरिकांत स्वच्छतेबाबत जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे कचरागाडी शहरात फिरत असताना नागरिक थांबून उत्सुकतेने हा प्रकार बघत असून पालिकेच्या या प्रयोगाचे कौतूकही केले जात असल्याचे दिसले. म्हणूनच नगर परिषदेच्या कचरागाड्या स्वच्छतादूताचे काम करीत असल्याचे बोलले जात आहे.