शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सर्वसाधारण सभेला आचारसंहितेचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 21:07 IST

दर महिन्यात सर्वसाधारण सभा घेणे नगर परिषदेला बंधनकारक आहे. मात्र डिसेंबर महिन्यात झालेल्या सभेनंतर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झालेलीच नाही. याला मात्र आता आचारसंहितेचा खोडा आला आहे. कारण मार्च महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून येत्या २३ मे रोजी निकाल लागणार आहेत.

ठळक मुद्देजानेवारीनंतर सभाच नाही : आता जूनपर्यंत सभेचा मुहूर्त दिसेना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दर महिन्यात सर्वसाधारण सभा घेणे नगर परिषदेला बंधनकारक आहे. मात्र डिसेंबर महिन्यात झालेल्या सभेनंतर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झालेलीच नाही. याला मात्र आता आचारसंहितेचा खोडा आला आहे. कारण मार्च महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असून येत्या २३ मे रोजी निकाल लागणार आहेत. त्यामुळे आमसभेला जून महिन्यापर्यंत तरी मुहूर्त मिळणार नसल्याचे दिसते.नगर परिषदेतील कोणत्याही विकास व अंतर्गत कामकाजासाठी सर्वसाधारण सभेची मंजूरी घेणे आवश्यक आहे. याकरिता दर महिन्याला सर्वसाधारण घेणे नगर परिषद अधिनियम १९६५ अंतर्गत बंधनकारक करण्यात आले आहे. सभेत विविध मुद्दे मांडून सभेची मंजूरी मिळाल्यावरच ती कामे केली जातात. अध्यक्षांच्या मागणीवरून ही सर्वसाधारण सभा बोलाविली जात असून सभेची विषयसूची अध्यक्षच तयार करतात. यामुळे वेळेवर सर्वसाधारण सभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे.प्राप्त माहितीनुसार, नगर परिषदेत मात्र १२ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभे नंतर सभा झालेलीच नाही. डिसेंबर महिन्यात सर्वसाधारण सभा झाल्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सभा घेता आली असती. मात्र या दोन महिन्यांत सर्वसाधारण सभा झाली नाही. त्यानंतर १० मार्च रोजी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नगर परिषदेला सर्वसाधारण सभा घेता आली नाही. विशेष म्हणजे, आता २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. अशात आता तोपर्यंत तरी नगर परिषदेला सभा घेता येणार नसल्याचे समजते.म्हणजेच, जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातील सर्वसाधारण नगर परिषदेने घेतली नसतानाच, आता मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांतील सर्वसाधारण सभेत आचारसंहितेचा खोडा येत आहे. एकंदर पाच महिने सर्वसाधारण सभा होणार नसल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.विकासकामांना लागला ब्रेकसर्वसाधारण सभेच्या मंजूरीशिवाय पालिकेतील कोणतीही विकासकामे होत नाहीत. अशात जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांच्या कालावधीत तीन आमसभा झाल्या असत्या. मात्र मार्च महिन्यापासून आचारसंहितेचा फटका बसल्याने आता एप्रिल व मे महिन्यातही काही सर्वसाधारण सभा होणार नसल्याचे दिसते. त्यामुळे मात्र विकासकामे अडकून पडली आहेत. सर्वसाधारण सभेत प्रस्तावांना मंजूरी मिळाल्यावरच ही कामे करता येतील.

 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका