शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

थंडीने गारठला जिल्हा

By admin | Updated: December 26, 2015 01:53 IST

मागील पाच-सहा दिवसांपासून थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने तापमान १० अंशांवर घसरले आहे.

पारा १० अंशांवर: पाच दिवसांपासून तीव्रता वाढलीगोंदिया : मागील पाच-सहा दिवसांपासून थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने तापमान १० अंशांवर घसरले आहे. त्यामुळे एकीकडे गरम कपड्यांची विक्री वाढली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून ऊब मिळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. पाच ते सहा दिवसांपासून सकाळी थंडीची लाट वाढल्याचे समजून येते. या थंडीची हुडहुडी आता दिवसभर कमी-अधिक प्रमाणात कायम राहते. मागील तीन ते चार वर्षापासून परिसरात दुष्काळाचे चित्र दिसून येत आहे. मागील वर्षी हिवाळ्याच्या आठ-दहा दिवस कमीअधिक प्रमाणात थंडी जाणवली, मात्र नंतर हा ऋतूच जाणवला नाही. सध्याचे वर्ष तर मागील वर्षापेक्षा अधिक तीव्र दुष्काळी आहे. पाऊसही खूपच कमी पडला. परतीचा मान्सूनचा तर पत्ताच नाही. या भागात परतीचा पाऊस पडला नसला तरी शेजारच्या राज्यात कहर केला. उत्तरेकडे बर्फवृष्टी झाली आणि तेथील थंडीची झुळूक येथपर्यंत आली. मागील १५ दिवसांपासून अंगाला गारवा जाणवू लागला होता. पण मागील पाच ते सहा दिवसांपासून त्याची तीव्रता अधिक वाढली आहे. पहाटे व सकाळी गरम कपडे घालून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. पहाटे तर बोचणारी व अंगाला झोंबणारी थंडी जाणवते. त्यामुळे दुष्काळात थंडीची चाहूल हवीहवीशी वाटणारी ठरली आहे. सामान्य माणूस थंडीचा अनुभव घेवू लागला आहे. सकाळचा गारवा अनुभवला जात आहे. विशेष म्हणजे थंडी जाणवू लागली तरी हिवाळ्यातील पहाटेचे दवबिंदू कुठेच दिसत नाही. वातावरणातील आर्द्रताच कमी झाल्याचा हा परिणाम आहे. दवबिंदू नसल्याने कोरड्या थंडीचा चटका जाणवत आहे. त्यात पहाटे व सकाळच्या वाऱ्याने भर घातल्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. आता ग्रामीण परिसरात शेकोट्या पेटवून गरमी मिळविण्यासाठी एकत्र आलेली मंडळी, असे चित्र दिसून येत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही तीव्रता अधिक आहे. सकाळी व दिवस मावळल्यानंतर सायंकाळी गारवा जाणवू लागला आहे. (प्रतिनिधी)