शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

गार्डन व कॉन्फरन्स हॉलला लोकार्पणाची प्रतीक्षा

By admin | Updated: February 9, 2015 23:15 IST

येथील पर्यटन संकुल परिसरात सुमारे पाच वर्षापूर्वीच तयार केलेले गार्डन व कॉन्फरंस हॉल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अजूनही लोकार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत.

नवेगावबांध : येथील पर्यटन संकुल परिसरात सुमारे पाच वर्षापूर्वीच तयार केलेले गार्डन व कॉन्फरंस हॉल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अजूनही लोकार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत झालेल्या आढवा बैठकीत अधिकाऱ्यांनी जानेवारीच्या अखेरपर्यंत लोकार्पण करण्ळाचे ठरविले होते. परंतु लोकार्पणाबाबत कोणत्याच हालचाली दिसून येत नसल्यामुळे पर्यटनप्रेमींमध्ये कमालाची नाराजी दिसून येत आहे.येथे तयार करण्यात आलेल्या गार्डनमध्ये निरीक्षण मनोरे, रॉक गार्डन, वॉटर फॉल, म्युझिकल फाऊंडेशन, फुलबाग, गॅलरी आदि तयार करण्यात आलेले आहेत. परंतु याचा उपयोग मात्र पर्यटकांसाठी मुळीच झालेले नाही. येथे अजूनपर्यंत मुळीच झालेले नाही. कारण लोकार्पण न झाल्यामुळे येथील मुख्य द्वार सदैव बंदच असते. अजुनही विद्युत मिटरदेखील घेण्ळात आलेले नसल्याचे समजते. बरेच वर्षापासून बंद अवस्थेत राहिल्यामुळे आतार या गार्डनची दुरावस्था सुरू झालेली आहे. सौंदर्यकरणासाठी लावलेले दिवे फुटलेले आहेत. मनोऱ्यांना गंज चढलेला आहे. गॅलरीला भेगा पडलेल्या आहेत. म्युझिकल फाऊंडेशनचे साहित्य देखील खराब झाल्यासारखे दिसून येते. गार्डनच्या लॉनचे व्यवस्थापन योग्य प्रमाणात करण्यात आलेले नाही. रॉक गार्डनमधील दगडांच्या अनेक मुर्त्या फुटलेल्या अवस्थेत आहे. पर्यटकांसाठी बनविलेले गार्डनची पर्यटकांविनाच दुरवस्था झालेली आहे.कॉन्फरंस हॉल तयार होऊन उभा आकहे. योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे समोरील विजेच दिवे फुटलेले आहेत. समोरील फवारा सुरुच करण्यात आला नाही. मुख्य द्वार नेहमीच बंद राहत असल्यामुळे आतमध्ये अजून काय काय फुटले आहे हे समजायला मार्ग नाही. या दोन्ही कामात कोटीच्या घरात निधी खर्च करण्यात आल्याचे बोलले जाते परंतु तो मात्र पर्यटन विकासाच्या कामी अजून आला नाही . कारण याचा पर्यटकांना आनंदच घेता आला नाही. प्रशासकीय अधिकारी व संबंधित कंत्राटदार यांचे लागेबांधे असल्यामुळे लोकार्पणाला विलंब होत असल्याचा आरोपही होत आहे. आढावा बैठकीत झालेल्या निर्णयानंतर लोकार्पण होणार असल्याने सर्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु अधिकाऱ्यांनी मात्र गोड गोड बोलून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचीच दिशाभूल केल्याचाही आरोप होत संबंधीत विभागाने गार्डन व कॉन्फरंस हॉलचे लोकार्पण करुन संचालन व व्यवस्थापनाची जबाबदारी एखाद्या शासकीय विभागाकडे किंवा स्वयंसेवी संस्थेकडे द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय उद्यान बचाव संघर्ष समितीतर्फे करण्यात आलेली आहे. (वार्ताहर)