शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

मोकळ्या जागेत खड्डा खोदून टाकण्यात आला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

गणेशनगरवासीयांना कचऱ्यापासून सुटका मिळाली याचा आनंद होता. मात्र गुरुवारी (दि.१८) दुपारी गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात डिस्पोजेबल, लग्नातील शिळे अन्न, तसेच मेलेल्या वराहाला टाकण्यात आले व खड्डा बुजविण्यात आला नाही. त्यानंतर कुत्र्यांनी तेथे धुडघूस घातला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रासले आहेत. नगर परिषदेचे हे कृत्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, यानंतर मात्र त्यांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विशेष सभेत झालेल्या निर्णयानंतर नगर परिषदेने आता मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद केले आहे. मात्र असे असतानाच गुरुवारी (दि.१८) गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात लग्नातील शिळे अन्न व मेलेल्या वराहाला टाकण्यात आले आहे. त्यातून पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नगर परिषदेने हे कृत्य केले असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, गणेशनगरवासीयांत पुन्हा एकदा रोष निर्माण झाला आहे. मोक्षधाम परिसरात टाकला जात असलेला कचरा व त्याला आग लावल्याने निघणाऱ्या धुरापासून गणेशनगर व परिसरातील अन्य वसाहतींमधील नागरिक त्रासले होते. यावर नागरिकांनी एकत्र येऊन नगर परिषदेवर मोर्चा काढला होता. नागरिक व नगर परिषदेचा हा लढा चांगलाच वाढल्याने नगर परिषदेने यावर तोडगा काढण्यासाठी मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद केले आहे. एवढेच नव्हे तर बुधवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या विशेष सभेत शहरातील कचरा टाकण्यासाठी पिंडकेपार परिसरात जागा घेण्याचे ठरले होते. यामुळे गणेशनगरवासीयांना कचऱ्यापासून सुटका मिळाली याचा आनंद होता. मात्र गुरुवारी (दि.१८) दुपारी गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात डिस्पोजेबल, लग्नातील शिळे अन्न, तसेच मेलेल्या वराहाला टाकण्यात आले व खड्डा बुजविण्यात आला नाही. त्यानंतर कुत्र्यांनी तेथे धुडघूस घातला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रासले आहेत. नगर परिषदेचे हे कृत्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, यानंतर मात्र त्यांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे.

नागरिकांनी केली संबंधितांवर कारवाईची मागणी - गुरुवारी टाकण्यात आलेल्या कचऱ्यात लग्नातील शिळे अन्न व डिस्पोजेबल आहे. सोबतच ३ मेलेले वराह असल्याने हे नगर परिषदेचेच काम असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे. एकीकडे कचरा टाकण्यासाठी पिंडकेपार येथे जागेची व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर कोठेही कचरा टाकला जात असल्याने नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

 

टॅग्स :dumpingकचरा