शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोकळ्या जागेत खड्डा खोदून टाकण्यात आला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

गणेशनगरवासीयांना कचऱ्यापासून सुटका मिळाली याचा आनंद होता. मात्र गुरुवारी (दि.१८) दुपारी गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात डिस्पोजेबल, लग्नातील शिळे अन्न, तसेच मेलेल्या वराहाला टाकण्यात आले व खड्डा बुजविण्यात आला नाही. त्यानंतर कुत्र्यांनी तेथे धुडघूस घातला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रासले आहेत. नगर परिषदेचे हे कृत्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, यानंतर मात्र त्यांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विशेष सभेत झालेल्या निर्णयानंतर नगर परिषदेने आता मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद केले आहे. मात्र असे असतानाच गुरुवारी (दि.१८) गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात लग्नातील शिळे अन्न व मेलेल्या वराहाला टाकण्यात आले आहे. त्यातून पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नगर परिषदेने हे कृत्य केले असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, गणेशनगरवासीयांत पुन्हा एकदा रोष निर्माण झाला आहे. मोक्षधाम परिसरात टाकला जात असलेला कचरा व त्याला आग लावल्याने निघणाऱ्या धुरापासून गणेशनगर व परिसरातील अन्य वसाहतींमधील नागरिक त्रासले होते. यावर नागरिकांनी एकत्र येऊन नगर परिषदेवर मोर्चा काढला होता. नागरिक व नगर परिषदेचा हा लढा चांगलाच वाढल्याने नगर परिषदेने यावर तोडगा काढण्यासाठी मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद केले आहे. एवढेच नव्हे तर बुधवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या विशेष सभेत शहरातील कचरा टाकण्यासाठी पिंडकेपार परिसरात जागा घेण्याचे ठरले होते. यामुळे गणेशनगरवासीयांना कचऱ्यापासून सुटका मिळाली याचा आनंद होता. मात्र गुरुवारी (दि.१८) दुपारी गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात डिस्पोजेबल, लग्नातील शिळे अन्न, तसेच मेलेल्या वराहाला टाकण्यात आले व खड्डा बुजविण्यात आला नाही. त्यानंतर कुत्र्यांनी तेथे धुडघूस घातला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रासले आहेत. नगर परिषदेचे हे कृत्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, यानंतर मात्र त्यांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे.

नागरिकांनी केली संबंधितांवर कारवाईची मागणी - गुरुवारी टाकण्यात आलेल्या कचऱ्यात लग्नातील शिळे अन्न व डिस्पोजेबल आहे. सोबतच ३ मेलेले वराह असल्याने हे नगर परिषदेचेच काम असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे. एकीकडे कचरा टाकण्यासाठी पिंडकेपार येथे जागेची व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर कोठेही कचरा टाकला जात असल्याने नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

 

टॅग्स :dumpingकचरा