शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

गणेश मंडळ बुजविणार खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:51 IST

लोकांमध्ये सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, बंधूभाव निर्माण होऊन विधायक कार्य व्हावीत, सामाजिक बांधिलकी जपली जावी.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी जपत मंडळांचा पुढाकार : लोक वर्गणीची रक्कम करणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकांमध्ये सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, बंधूभाव निर्माण होऊन विधायक कार्य व्हावीत, सामाजिक बांधिलकी जपली जावी. याच उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात केली. याच गोष्टींचे भान ठेवित शहरातील काही गणेश मंडळांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी न केल्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून रस्त्यांना गटाराचे स्वरुप आले आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवरुन वाहने चालविणाºया वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. तर हेच हाल पायी चालणाºया नागरिकांचे आहे. सिव्हिल लाईन, रामनगर, छोटा गोंदिया, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक या मार्गावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत.या मार्गावर दिवसभर सतत वर्दळ असते. रस्त्यांवरील खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने त्यांना सध्या गटाराचे स्वरुप आले आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी शहरातील काही जागृत नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रार केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने गणेशदर्शनासाठी घराबाहेर पडणाºया नागरिकांना त्याचा फटका बसत आहे.याच सर्व गोष्टींची दखल शहरातील काही गणेश मंडळांनी घेतली आहे. केवळ प्रसिध्दी मिळावी यासाठी नव्हे तर सामाजिक बांधीलकी जपत शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा संकल्प केला आहे. सिव्हिल लाईन येथील अपना गणेशोत्सव मंडळ, छोटा गोंदिया येथील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ स्व:खर्चातून रस्त्यांवरील खड्डे बुजविणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले. हाच आदर्श शहरातील इतर मंडळानी घेण्याची गरज आहे.‘खड्डे बुजवा जीव वाचवा’अभियानगणेश मंडळाचा उद्देश सामाजिक बांधिलकी जपून समाजाचा उध्दार करणे हा आहे. यंदाचा गणेश उत्सव अधिक समाजाभिमुख करण्यासाठी सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे. याच प्रयत्नाचे एक पाऊल म्हणजे ‘खड्डे बुजवा जीव वाचवा’ हे अभियान राबविण्याचे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी विभागाने केले आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्याकडे जमा होणाºया लोक वर्गणीतून १० टक्के रक्कम परिसरातील असलेले खड्डे बुजविण्यासाठी व गरीब मुलांच्या सेवेसाठी खर्च करण्याचे आवाहन सहायक धर्मदाय आयुक्त ममता रेहपाडे यांनी केले आहे.इतर मंडळांनी घ्यावा आदर्शशहरातील नागरिकांप्रती आपले कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील गणेश मंडळानी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.