शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

-तर गोंदियाला डेंग्यु-मलेरियाचा विळखा

By admin | Updated: July 31, 2016 00:17 IST

शहरातील घाणीच्या समस्येवर तोडगा निघण्याची चिन्हे काही केल्या दिसत नाहीत. शहरात बघावे तिकडे घाणीचे ढिग लागलेले आहेत.

बघावे तिकडे कचऱ्याचे ढीग गोंदिया : शहरातील घाणीच्या समस्येवर तोडगा निघण्याची चिन्हे काही केल्या दिसत नाहीत. शहरात बघावे तिकडे घाणीचे ढिग लागलेले आहेत. मान्सूनपूर्व सफाईचाही काहीच फायदा जाणवत नाही. नाल्यांची स्थिती होती तीच आहे. परिणामी शहराला लागलेला घाणीचा विळखा कायम आहे. ही स्थिती अशीच कायम राहिली तर डासांचा प्रादुर्भाव आणखी वाढून शहरवासीयांना डेंग्यु, मलेरियाच्या आहारी जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा हा आजारांचा काळ असतो. जलजन्य व संसर्गजन्य आजार या काळात झपाट्याने पसरतात. परिणामी पावसाळ््यात पाहिजे तेवढी स्वच्छता व त्यासोबतच सावधानी बाळगण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. त्यानुसार नागरिक आपल्या घरातील स्वच्छेवर जोर देऊन ती पाळू लागतात. मात्र गोंदिया शहरातील स्वच्छतेवर कोणाचेच नियंत्रण चालत नाही. परिणामी त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. शहरात बघावे तिकडे कचऱ्यांचे ढिग लागलेले दिसत आहेत. अन्य काळात ही बाब तेवढी गंभीर वाटत नाही. मात्र पावसाळ््यात घाणीमुळे आजारांचा धोका वाढतो. आज शहरातील प्रत्येकच भागात घाणीचे ढिगार दिसून येत आहेत. यातून शहरवासीयांचे आरोग्य कितपत सुरक्षित आहे याची प्रचिती येते. शिवाय नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाची कर्तव्यतत्परता सुद्धा यातून नजरेत येते. घाणीचे ढिगार, सांडपाण्याने तुंबलेल्या नाल्या या सर्व प्रकारामुळे शहरात एकतर नाक दाबून वावरावे लागत आहे. तसेच डासांचा प्रकोप वाढल्याने डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारांच्या दहशतीत शहरवासी आपले दिवस घालवत आहेत. नगर परिषद मात्र उघड्या डोळ््याने हा प्रकार बघत असल्याने शहरवासीयांत रोष खदखदत आहे. (शहर प्रतिनिधी) यंत्रणा ठरतेय कुचकामी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे २७२ स्थायी सफाई कर्मचारी व १८ रोजंदारी कर्मचारी आजघडीला कार्यरत आहेत. तसेच निघालेल्या कचऱ्याची उचल करण्यासाठी नगर परिषदेचे सहा तर भाड्याने घेतलेले सहा ट्रॅक्टर आहेत. यातील एक ट्रॅक्टर बाजार भागासाठी असून दिवसातून तीन ट्रीप मारतो. १० ट्रॅक्टर शहरातील प्रभागांत जातात. तर एक ट्रॅक्टर इमरजंसी सेवेसाठी असतो. एवढी सर्व ताफा असतानाही शहरातील स्थिती बघता हे सर्व काही कुचकामी ठरत असल्याचेच दिसून पडते. कारण एवढे मनुष्यबळ व वाहने असतानाही शहर बकाल झाले आहे. मान्सूनपूर्व सफाई अभियान अयशस्वी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगर परिषदेकडून कचरा व नाल्यांची सफाई करण्यासाठी मान्सूनपूर्व सफाई अभियान राबविले जाते. विशेष म्हणजे यासाठी काही कर्मचारी व वाहन कंत्राटी तत्वावर घेतले जातात. या अभियानांतर्गत शहरातील मोठे नाले, अंतर्गत लहान नाल्यांची सफाई, त्यातील गाळ काढून बंद पडलेल्या नाल्या मोकळ््या करणे आदी कामे केली जातात. मात्र शहरातील कित्येक नाल्यांची सफाईच झालेली नसून त्या चोक पडून असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यातून मान्सूनपूर्व सफाई अभियान फेल ठरल्याचेच दिसते.