शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

गोंदिया जिल्ह्यातील ७६ गावात नदी व नाल्याकाठी करावा लागतो अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:21 IST

Gondia news गोंदिया जिल्ह्यातील ७६ गावात स्मशानभूमी नसल्याने मृतकाच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना गावाबाहेरील मोकळी जागा अथवा नदी किंवा नाल्याकाठी  मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात.

ठळक मुद्देगाव तिथे स्मशानभूमी योजना कागदावर पावसाळ्यात होते सर्वाधिक गैरसोय 

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने गाव तिथे स्मशानभूमी ही संकल्पना राबविली. मात्र यानंतर अजूनही जिल्ह्यातील ७६ गावात स्मशानभूमी नसल्याने मृतकाच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना गावाबाहेरील मोकळी जागा अथवा नदी किंवा नाल्याकाठी  मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागते. सर्वाधिक अडचण ही पावसाळ्याच्या दिवसात होते. मृतकाचा अंत्यविधी पार पाडण्यासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडून निधी देखील मंजूर केला जातो. मृत्यूनंतर मानवी देहाची विटबंना होवू नये, अखेरचा प्रवास सुखाचा व्हावा हीच अपेक्षा सर्वांची असते. मात्र जिल्ह्यातील ९३१ गावांपैकी अद्यापही ७६ गावात स्मशानभूमी नसल्याने तेथील गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी नदी किंवा नाल्याच्या काठाचा आधार घ्यावा लागतो. मात्र पावसाळ्यात सर्वाधिक समस्या निर्माण होते. ही बाब गावकऱ्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली पण अजुनही याची दखल घेण्यात आली नाही. 

मु.पो. खोलगड ता.सालेकसासालेकसा तालुक्यातील खोलगड या गावात अद्यापही स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना गावापासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या नाल्यावर जावे लागते. मागील आठ दहा वर्षांपासून या गावातील नागरिक ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाकडे स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करीेत आहेत. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

मु.पो. मुंडीकोटा ता. तिरोडातिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा हे मोठे गाव असून या गावात अद्यापही स्मशानभूमीसाठी जागा नाही.त्यामुळे मुंडीकोटासह  दोन गावांना भंभोडी मार्गावरील रस्त्यालगत अथवा गावापासून २ कि.मी.अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर मृतदेहावर अंत्यविधी करावा लागतो. मात्र सर्वाधिक अडचण ही पावसाळ्याच्या दिवसात होते. स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करुन त्या ठिकाणी शेड तयार करुन देण्याची नागरिकांची मागणी आहे. मात्र अजुनही ही मागणी मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे. 

टॅग्स :Governmentसरकार