शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मग्रारोहयो, निर्मलग्राम व तंमुसचा निधी हडपला

By admin | Updated: August 30, 2015 01:42 IST

गावकऱ्यांनी आमसभेत सन २०१२ ते २०१५ पर्यंत मग्रारोहयो, निर्मल व तंमुसला प्राप्त झालेल्या ....

पुतळीत भ्रष्टाचार : चौकशी झालीच नाहीशेंडा (कोयलारी) : गावकऱ्यांनी आमसभेत सन २०१२ ते २०१५ पर्यंत मग्रारोहयो, निर्मल व तंमुसला प्राप्त झालेल्या निधीचा लेखाजोखा मागताच ग्रामसेवक ए.व्ही. रामटेके यांनी कोरम पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करुन गाशा गुंडाळल्या. यावरुन वरील शासन प्राप्त रकमेचा मोठा गबाळ झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.मग्रारोहयो, निर्मलग्राम व तंमुसला प्राप्त झालेल्या रकमेचा हिशेब मागताच ग्रामसेवकाने कोरम पूर्ण होत नसल्याचे कारण पुढे करून आमसभा तहकूब झाल्याचे जाहीर केले. मागील तीन वर्षात रोहयो अंतर्गत एकही काम झाले नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष होता. त्यांचा रोष बघून पुढील आमसभा २२ आॅगस्ट रोजी घेण्यात येईल असे सांगण्यात आले. पुतळीच्या आमसभेसाठी प्रश्नावली तयार करुन ठेवली होती व लोकांची उपस्थिती २०० च्या वर होती. जि.प. सदस्य सरिता कापगते, उपसभापती विलास शिवणकर व विस्तार अधिकारी झांबरे हे ही उपस्थित होते. त्या सभेला सुद्धा ग्रामसेवक रामटेके हजर झाले नाही. यावरुन ग्रामपंचायतला प्राप्त झालेल्या निधीचा गबाळ झाला असावा अशी शंका जनतेच्या मनात बळावली. मागील तीन वर्षात विकासाचे एकही काम झाले नाही. त्याचप्रमाणे १५ सप्टेंबरपर्यंतच आमसभेची मुदत आहे. वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या नावावर वेळ काढू धोरण अवलंबित आहेत. यावरून वरिष्ठांचे शुद्धा हात ओले झाले असावे, अशी शंका आहे. आमसभा झाली नाही तर गावातील समस्या जश्याच्या तश्याच राहतील असे गावकऱ्यांना वाटत आहे. सदर प्रकरणाची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. गोंदिया व खंड विकास अधिकारी पं.स. सडक अर्जुनी यांच्याकडे करण्यात आली. परंतु आजपावेतो चौकशी करण्यात आली नाही. (वार्ताहर)