शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पर्यटन विकासासाठी निधी कमी पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:33 IST

गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : २५ लाखांच्या रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे. मात्र आम्ही कायदेशीर मार्ग काढून जिल्ह्याच्या पर्यटन विकास करीत राहू आणि याकरिता निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.नवेगावबांध पर्यटन स्थळ अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बुधवारी (दि.१६) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स.सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. नैरागकर, खंडविकास अधिकारी जमईवार, विजया कापगते, मधुकर मरस्कोल्हे, खुशाल काशिवार, केवळराम पुस्तोडे, तंमुस अध्यक्ष महादेव बोरकर, मुलचंद गुप्ता, अण्णा डोंगरवार, चंद्रशेखर मेश्राम तसेच ग्रा.पं.चे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.नवेगावबांध ग्रामपंचायतकरिता १०० बैठकी खुर्च्याकरिता ४ लक्ष रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा याप्रसंगी ना. बडोले यांनी केली. रमाई आवास योजनेंतर्गत शत प्रतिशत लाभार्थ्यांना घर देणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे छत्तीसगड राज्यात धानाला जास्त भाव तेथील सरकार देत असल्याचा माजी खासदार नाना पटोले खोटा प्रचार करीत असल्याचा आरोप याप्रसंगी बडोले यांनी आपल्या भाषणातून केला. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता वैरागकर यांनी मांडले. संचालन अशोक परशुरामकर यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी पी.आर. चव्हाण यांनी मानले.झाशीनगर योजनेचे लोकार्पण व भूमिपूजन फेब्रुवारीतनवेगावबांध विस्तार अंतर्गत पिण्याच्या पाण्याबद्दल बोलताना ना. बडोले यांनी, झाशीनगर उपसा सिंचनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन झाले आहे. त्यामुळे फेबु्रवारी महिन्यात पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करुन जनतेच्या सिंचन प्रश्नावर कायम स्वरुप तोडगा निघणार असल्याचे सांगीतले. तसेच शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याबद्दल आपले सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटनRajkumar Badoleराजकुमार बडोले