शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

पर्यटन विकासासाठी निधी कमी पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 00:33 IST

गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : २५ लाखांच्या रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र पर्यावरणाचा बाऊ समोर करुन पर्यटन विकासात बाधा निर्माण करण्याचे काम काही प्रवृत्ती निरंतर करीत आहे. मात्र आम्ही कायदेशीर मार्ग काढून जिल्ह्याच्या पर्यटन विकास करीत राहू आणि याकरिता निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.नवेगावबांध पर्यटन स्थळ अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी बुधवारी (दि.१६) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स.सभापती अरविंद शिवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एस. नैरागकर, खंडविकास अधिकारी जमईवार, विजया कापगते, मधुकर मरस्कोल्हे, खुशाल काशिवार, केवळराम पुस्तोडे, तंमुस अध्यक्ष महादेव बोरकर, मुलचंद गुप्ता, अण्णा डोंगरवार, चंद्रशेखर मेश्राम तसेच ग्रा.पं.चे सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.नवेगावबांध ग्रामपंचायतकरिता १०० बैठकी खुर्च्याकरिता ४ लक्ष रुपयांचा निधी देत असल्याची घोषणा याप्रसंगी ना. बडोले यांनी केली. रमाई आवास योजनेंतर्गत शत प्रतिशत लाभार्थ्यांना घर देणार असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे छत्तीसगड राज्यात धानाला जास्त भाव तेथील सरकार देत असल्याचा माजी खासदार नाना पटोले खोटा प्रचार करीत असल्याचा आरोप याप्रसंगी बडोले यांनी आपल्या भाषणातून केला. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता वैरागकर यांनी मांडले. संचालन अशोक परशुरामकर यांनी केले. आभार ग्रामविकास अधिकारी पी.आर. चव्हाण यांनी मानले.झाशीनगर योजनेचे लोकार्पण व भूमिपूजन फेब्रुवारीतनवेगावबांध विस्तार अंतर्गत पिण्याच्या पाण्याबद्दल बोलताना ना. बडोले यांनी, झाशीनगर उपसा सिंचनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन झाले आहे. त्यामुळे फेबु्रवारी महिन्यात पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन करुन जनतेच्या सिंचन प्रश्नावर कायम स्वरुप तोडगा निघणार असल्याचे सांगीतले. तसेच शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याबद्दल आपले सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :tourismपर्यटनRajkumar Badoleराजकुमार बडोले