शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

मजुरांचा पंचायत समितीवर मोर्चा

By admin | Updated: February 10, 2017 01:17 IST

जीव धोक्यात घालून काम करीत असलेल्या मजुरांना पाहिजे त्या प्रमाणात मजुरी दिली जात नाही.

कालव्याच्या कामात गौडबंगाल : निवदेनातून केली कारवाईची मागणीपरसवाडा : जीव धोक्यात घालून काम करीत असलेल्या मजुरांना पाहिजे त्या प्रमाणात मजुरी दिली जात नाही. परिणामी मजुरांमध्ये असंतोष असल्याने करटी बु. ते डब्बेटोला या कालव्याच्या कामावर काम करीत असलेल्या मजुरांनी पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी मजुरांनी खंड विकास अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांपुढे आपली आपबिती मांडत त्यांना लेखी निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत करटी बु. अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १८ जानेवारीपासून करटी बु. ते डब्बेटोला नहराचे काम सुरु झाले. सदर नहर खैरबंदा जलाशयाचे असून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत ने काम सुरु केले आहे. सदर कामावर दररोज ३५० ते ३७५ मजूर काम करतात. पण हजेरी पत्रकात ४८८ मजुरांची नोंद आहे. २३/१/२०१७ ला पहिला हप्ता संपला.पण रोजगार सेवक जागेश्वर बघेले व कनिष्ठ अभियंता मग्रारोहयो यांनी मोजमाप न करता मोजमाप पुस्तीकेत गॅगनिहाय ४० ते ६० रुपये अल्प मजुरी काढली. सदर काम ज्या ठिकाणी आहे तेथे दगड, मुरुम असून कालव्याची खोली २५ ते ३० फुट खोल पहाडी क्षेत्र आहे. त्यांना लीड व दगड मुरुम खोदकामाचे पैसे दर न देता माती काम केल्याची मजुरी देण्यात आली.कनिष्ठ अभियंता सुनिल पारधी यांनी १५० ते १६० रुपये मजुरी देण्यात येईल असे लेखी स्वरूपात मजुरांना लिहून दिले. तरी ४० ते ६० रुपये मजुरी देण्यात आली. यासाठी करटी बु. येथील मजुरांनी अन्याय झाला असल्याचे आपली मागणीसाठी तिरोडा पंचायत समिती कार्यालयाकडे मोर्चा वळविला. यात मोठा घोळ झाल्याचे मजुरांनी आपली आपबीती खंडविकास अधिकारी दुबे व मग्रारोहयोचे विस्तार अधिकारी कांबळे यांना लेखी तक्रारी नुसार दिली. यावर कांबळे यांनी, १९२ रुपये मजुरीचे दर असल्याचे मजुरांना सांगितले. मात्र अल्प मजुरी कशी असा प्रश्न मजुरांना पडला आहे. चौकशी करुन संबंधित कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याचे व १९२ रुपये मजुरी देण्यात येईल असे आश्वासन कांबळे यांनी मजुरांना दिले.रोजगार सेवकाच्या नावातही घोळ ग्रामसभेत रोजगार सेवक विनायक शामलाल बघेले यांची निवड करण्यात आली होती. पण विनायकचे लहान भाऊ जागेश्वर बघेलेच कार्यालयात व मग्रारोहयोचे काम करीत असतात. जागेश्वर बघेले यांची कधी रोजगार सेवकपदी निवड झाली, नाव कधी बदलविण्यात आले, नियुक्ती न करता कार्यभार देण्यात आला, हे ग्रामपंचायत व ग्रामसेवकालाच ठाऊक.रोजगार सेवक मजुरांकडून पैशाची मागणी करतात. पैसे दिले नाही म्हणून मजुरी कमी काढणार असल्याचे रोजगार सेवक कार्यरत बघेले बोलले. सदर कामात घोळ झाला असून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)