शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

६२ बसेसमध्ये नि:शुल्क वाय-फाय

By admin | Updated: April 1, 2017 02:18 IST

सुरक्षित प्रवासाचे ब्रिद घेवून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी नि:शुल्क वाय-फाय सेवा देण्याच्या प्रक्रियेचे काम सुरू आहे.

लांब पल्ल्यांच्या दोन गाड्या सुरू : १५ एप्रिलनंतर मानव विकासच्या बसेस प्रवासी सेवेत देवानंद शहारे   गोंदिया सुरक्षित प्रवासाचे ब्रिद घेवून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी नि:शुल्क वाय-फाय सेवा देण्याच्या प्रक्रियेचे काम सुरू आहे. त्यातच गोंदिया आगारातील ६२ बसेसमध्ये ही सेवा प्रवाशांसाठी नि:शुल्क सुरू करण्यात आली आहे तर उर्वरित बसेसमध्येसुद्धा पुढील आठवड्यापर्यंत वाय-फाय सेवा सुरू होणार आहे. आता लग्न सराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढत आहे. ही बाब हेरून राज्य परिवहन महामंडळाने उन्हाळी बसेसचे नियोजन व बसेसमध्ये प्रवाशांसाठी नि:शुल्क वाय-फाय सेवा देण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. गोंदिया आगारात मानव विकास कार्यक्रमांतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या २८ बसेस व इतर ६५ अशा एकूण ९३ बसेस आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६२ बसेसमध्ये नि:शुल्क वाय-फाय सेवा सुरू करण्यात आली आहे तर तीन बसेस पुनर्बांधनीसाठी (रिकन्स्ट्रक्शन) आगाराच्या कार्यशाळेत आहेत. उर्वरित २८ बसेसमध्येसुद्धा पुढील आठवड्यापर्यंत प्रवाशांसाठी नि:शुल्क वाय-फाय सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले यांनी सांगितले. या उन्हाळ्यात आता लग्न सराईचा हंगाम बघता गोंदिया आगाराने लांब पल्ल्याच्या दोन बसेस २२ मार्चपासून सुरू केल्या आहेत. गोंदिया-काटोल ही हॉल्टींग बस दुपारी ४.१५ वाजता गोंदिया आगारातून सुटते व काटोल येथे मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता गोंदिया आगारात पोहोचते. तसेच गोंदिया-नागपूर ही बस गोंदिया आगारातून दुपारी १२.३० वाजता सुटते व त्याच दिवशी रात्री १० वाजतापर्यंत गोंदिया आगारात परतते. या लांब पल्ल्याच्या बससेवेमुळे प्रवाशांना मोठाच दिलासा मिळाला आहे. याशिवाय गोंदिया आगारात मानव विकास कार्यक्रमाच्या एकूण २८ स्कूल बसेस आहेत. मुलींची शालेय परीक्षा आटोपल्यानंतर त्या स्कूल बसेस १५ एप्रिलनंतर प्रवासी सेवेत लावण्यात येणार आहेत. या बसेस जिल्ह्यांतर्गतच धावणार असून त्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या उन्हाळ्यात गोंदिया आगाराचे उत्पन्न निश्चितच वाढणार आहे.