शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

निर्जन पाणवठ्यांवर विदेशी पाहुण्यांचा मुक्तसंचार

By admin | Updated: February 16, 2017 00:40 IST

तालुक्यातील जलाशये व पाणवठ्यांवर यंदा बऱ्यापैकी विदेशी पाहुण्यांचे आगमन झाले.

ग्रे लेग गुजचे प्रमाण अधिक : पक्ष्यांनीही शोधले सुरक्षित ठिकाण अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील जलाशये व पाणवठ्यांवर यंदा बऱ्यापैकी विदेशी पाहुण्यांचे आगमन झाले. फेबु्रवारी महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. नेहमीच्या प्रसिद्ध जलाशयासोबतच यावर्षी विदेशी पाहुण्यांनी निर्जन पाठवण्यांना पसंती दिल्याचे जाणवते. आगमन झालेल्या विदेशी पाहुण्यात युरोप खंडातील ग्रे लेग गुज पक्ष्यांची संख्या यावर्षी लक्षणिय आहे. सोनेगावसारख्या तलावावर त्यांची तात्पुरती हजेरी ही पक्षीप्रेमी व अभ्यासकांच्या दृष्टीने आनंदाची पर्वणी ठरती आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील राष्ट्रीय उद्यानातील नवेगाव जलाशय, इटियाडोह धरण, सिरेगावबांध, बोंडगाव/सुरबन येथील श्रृंगारबांध व भुरसीटोला तलावांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विदेशी पक्ष्यांची रेलचेल असायची. साधारणत: येथे आॅक्टोबर ते फेबु्रवारी महिन्यादरम्यान पक्षी मुक्कामी असतात. मात्र यावर्षी मोरगाव, माहुरकुडा तसेच बुटाई कॅम्पच्या फुटका तलावावर सुद्धा अल्प प्रमाणात का होईना, विदेशी पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. नवेगावबांध, भुरसोटीला, श्रृंगारबाद या तलावात मोठ्या प्रमाणावर भेट देणाऱ्या मुख्य विदेशी पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने ग्रे लेग गुज, लेसर विसलींग डक, चांदीकुट, गार्गनी, कॉमनटिल, पिनटेल, टपटेल पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड पाईपर, युरेशियन कर्लू, कॉम्बडक यांचा समावेश आहे. श्रृंगारबांध तलावावर यंदा ग्रेहॅरॉनचे दर्शन घडले. उन्हाळ्याची चाहूल लागताच हे विदेशी पक्षी साधारणपणे फेबु्रवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्वदेश परतीच्या मार्गाला लागतात. (तालुका प्रतिनिधी) मानवी उपद्रवापासून बचावाचा प्रयत्न सोनेगाव तलावावर यावर्षी प्रथमच ग्रे लेग गुज बघावयास मिळाला. यासोबतच ब्लेड विंग्ड स्टिक्ट, लिटल रिंग्ड प्लवर, ब्लेक आयबीस, इंडियन रोलर, कॉमन सेंड पायपर हे पक्षी मुक्तसंचार करताना आढळले. पक्षीप्रेमी व अभ्यासकांच्या दृष्टीने सोनेगाव तलाव दुर्लक्षित आहे. या तलावावर पक्षीगणना झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र अशा निर्जन तलावांवरील यावर्षीची विदेशी पक्ष्यांची हजेरी ही मानवी उपद्रवापासूनचा बचावाचा संकेत दर्शविले. यावर्षी विदेशी पक्ष्यांची तलावांवरील संख्या लक्षणिय आहे. त्यात मानवी हस्तक्षेप नसलेल्या तलावात हजेरी ही प्रथमत:च नाविन्यपूर्ण बाब दिसून आली. जलाशय, तलावशेजारील शेतात ट्रॅक्टर व मानवी आवाजामुळे पक्षी त्रस्त होतात. कोळी बांधवाकडून मासेमारी करताना अजाणतेपणाने पक्ष्यांचे अधिवास व घरटी किंबहूना अंडी नष्ट होतात. त्यामुळे पक्षी त्या तलावाकडे पाठ फिरवितात.